शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी नंबर १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST

राजकीय गटांची दावेदारी - नागपूर ग्रामीण, कुही आणि कामठी तालुक्यात भाजपची सरशी - आजी-माजी मंत्र्यांनी गाव राखलेे; जिल्हा परिषदेच्या ...

राजकीय गटांची दावेदारी

- नागपूर ग्रामीण, कुही आणि कामठी तालुक्यात भाजपची सरशी

- आजी-माजी मंत्र्यांनी गाव राखलेे; जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला धक्का

नागपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील विजयानंतर नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीने भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीतही धक्का दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात महाविकास आघाडी समर्थित पॅनलने ८४ ग्रामपंचायतमध्ये दमदार यश मिळविले आहे. भाजप समर्थित पॅनलला कामठी, नागपूर ग्रामीण आणि कुही तालुक्यात मोठे यश मिळाले. जिल्ह्यात भाजप समर्थित पॅनलचा ३६ ग्रामपंचायतमध्ये सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले आहे. काँग्रेसने ८३, राष्ट्रवादी काँग्रेसने २७ ग्रामपंचायतवर स्पष्ट बहुमत मिळाल्याचा दावा केला आहे. इकडे भाजपने ६३ ग्रामपंचायतवर बहुमत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षांचे दावे किती खरे, किती खोटे हे स्पष्ट होईल.

जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यात कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) ग्रामपंचायत तर सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबतच कुही तालुक्यातील देवळी कला ग्रामपंचायतची निवडणूक मतदार यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे १२७ ग्रामपंचायतसाठी निवडणूक घेण्यात आली. तीत ३,१७,२४७ पैकी २,२३,५७९ (७४.८९ टक्के) मतदारांनी गावकारभाऱ्यांची निवड केली. काटोल आणि नरखेड तालुक्यात २० ग्रामपंचायतसाठी राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या दोन्ही तालुक्यात महाविकास आघाडीला १६ ग्रामपंचायतमध्ये यश मिळाले आहे.

सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रामपंचायत यावेळीही राखण्यात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना यश आले. येथे १७ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनलला १३, तर भाजप समर्थित पॅनलला एका जागेवर यश मिळाले.

कामठी तालुक्यातील कोराडी ग्रामपंचायत राखण्यात भाजपचे महामंत्री, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले. येथे भाजप समर्थित आदर्श ग्राम निर्माण आघाडीचा १७ पैकी १२ जागांवर, तर महाविकास आघाडीचा पाच जागांवर विजय झाला. गतवेळी येथे भाजप समर्थित पॅनलने १७ पैकी १७ जागांवर विजय मिळविला होता. यावेळी कोराडीत काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांनी भाजपला काहीसा धक्का दिला आहे.

कामठी तालुक्यात महालगाव ग्रामपंचायतच्या निकालात काँग्रेस समर्थित गटाचे ४, भाजप समर्थित गटाचे ३, तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. येथे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल निधान यांना काँग्रेसने धक्का दिला आहे.

काटोल तालुक्यातील ३ ग्रामपंचायतपैकी माळेगाव ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी (राष्ट्रवादीला) ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. येथे भोरगड आणि खंडाळा या दोन ग्रामपंचायतवर महाविकास आघाडी आणि भाजपने दावा केला आहे. नरखेड तालुक्यातील १७ पैकी १५ ग्रामपंचायतवर महाविकास आघाडी (राष्ट्रवादी), तर दोन ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित पॅनलला यश मिळाले आहे. सावनेर तालुक्यात १२ पैकी ११ ही ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीला (काँग्रेस) बहुमत मिळाले आहे. जटामखोरा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली होती.

कळमेश्वर तालुक्यात पाच पैकी चार ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी (काँग्रेस)ला यश मिळाले आहे. येथे सोनपूर (आदासा) ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली. रामटेक तालुक्यात ९ पैकी ८ ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीला (काँग्रेस, शिवसेना) यश मिळाले आहे. येथे एका ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित पॅनलला बहुमत मिळाले आहे.

पाराशिवनी तालुक्यात १० पैकी १० ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. मौदा तालुक्यातील ७ पैकी ४ ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी, तर ३ ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गटाला बहुमत मिळाले आहे. कामठी तालुक्यात ९ पैकी ६ ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गटाला, तर दोन ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी समर्थित गटाला यश मिळाले आहे. येथे एका ग्रामपंचायतमध्ये कुणालाही बहुमत मिळाले नाही.

उमरेड तालुक्यात १४ पैकी १० ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी (काँग्रेस), तर ४ ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गटाला यश मिळाले आहे.

भिवापूर तालुक्यात ३ पैकी दोन ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी (काँग्रेस) समर्थित गटाला बहुमत मिळाले, तर मोखाबर्डी ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गट नंबर १ वर राहिला आहे. तालुक्याचे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागले होते. येथे पंचायत समितीच्या सभापती ममता शेंडे यांचे सासरे तुळशीदास शेंडे यांचा भाजप समर्थित पॅनेलचे रोषण गायधने यांनी पराभव केला.

कुही तालुक्यात २४ पैकी १४ ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गट, तर १० ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीला (काँग्रेस) बहुमत मिळाले. जि.प. निवडणुकीतही काँग्रेसला कुही तालुक्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. नागपूर ग्रामीण तालुक्यात ११ पैकी ५ ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गट, महाविकास आघाडी (४), वंचित बहुजन आघाडी (१), तर एका ग्रामपंचायतमध्ये अपक्षांनी बाजी मारली. हिंगणा तालुक्यात ५ पैकी ३ ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी, तर एका ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गटाला यश मिळाले. येथे एका ग्रामपंचायतमध्ये कुणालाही बहुमत नाही.