शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Maharashtra Government: ''मध्यावधी निवडणुका नाही, पाच वर्षे स्थिर सरकार देऊ''

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 6:28 AM

राज्यात कुठल्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका होणार नाहीत.

नागपूर : राज्यात कुठल्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचाच आमचा प्रयत्न असेल व येणारे सरकार तकलादू नसेल, असे राष्ट्र वादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार स्पष्ट केले. मुस्लीम आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व पक्ष मिळून एकत्रित भूमिका ठरवतील. धर्मनिरपक्षेतेशी तडजोड करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.विदर्भ दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सरकार कधी स्थापन होईल हे आता सांगता येते नाही. काँग्रेसने प्रतिनिधी नेमले आहेत व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे. काँग्रेस व शिवसेना वगळता कुणाशीही आमची चर्चा सुरू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कोण असेल, असे विचारले असता, आताच कशाला ‘कार्ड’ खुले करू, एवढेच त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी व सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी प्रयत्न राहणार आहे. केंद्र या स्थितीबाबत किती गंभीर आहे ते माहिती नाही, पण शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी कृषी व वित्त मंत्रालयाशी चर्चा करू. तेथून दिलासा मिळाला नाही, तर थेट पंतप्रधान मोदींची भेट घेऊन, असे पवार यांनी सांगितले.सरसकट पंचनामे व्हावेतअवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ३३ टक्क्यांहून जास्त नुकसान झालेल्या पीकजमिनींचे पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, हे मापदंड योग्य नसून यात बदल करण्याची गरज असून सरसकट पंचनामे झाले पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली.महिला मुख्यमंत्र्यांसंदर्भात विचार नाहीराष्ट्रवादी काँग्रेसचा अडीच वर्षे मुख्यमंत्री झाला, तर सुप्रिया सुळे यांचे नाव समोर येऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, परंतु पवार यांनी अशी शक्यता खोडून काढली आहे. महिला मुख्यमंत्री झाली, तर आनंदच आहे. मात्र, या संदर्भात कुठलीही चर्चा किंवा प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, शिवसेना-आघाडी सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार, यावरही त्यांनी भाष्य टाळले.>शरद पवार म्हणाले, ‘मी पुन्हा येईन’तीन पक्षांचे सरकार टिकणार नाही व राज्यात भाजपचेच परत सरकार येईल, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे. यावर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकेच माझ्या डोक्यात असल्याचा चिमटा पवार यांनी काढला. फडणवीसांविषयी जेवढी माहिती आहे, त्यात ते ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक आहेत हे माहीत नव्हते, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस