शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांना कर्ज

By admin | Updated: April 17, 2016 02:50 IST

रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल केल्यानंतर महिन्यांत शेतकऱ्यांना १२.६० लाख रुपयांचे खरीप कर्ज वाटप केले आहे.

१२.६० लाखांचे वाटप : कर्जाची परतफेड केलेल्यांनाच कर्जनागपूर : रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल केल्यानंतर महिन्यांत शेतकऱ्यांना १२.६० लाख रुपयांचे खरीप कर्ज वाटप केले आहे. कर्जाची परतफेड केलेल्यांनाच कर्ज मिळेल, असा इशारा बँकेने दिला आहे. खरीप हंगाम सुरू व्हायला अद्याप बराच कालावधी आहे. पण बँकेने कर्ज वाटपाला सुरुवात केली आहे. कर्ज वाटप सप्टेंबरपर्यंत होणार आहे, पण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जूनपर्यंत कर्ज वाटपाला वेग राहणार आहे. अन्य बँकांच्या तुलनेत कर्जवाटप सोपेशेतकऱ्यांसाठी ही बँक सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. बँकेने २०१४ च्या खरीप हंगामासाठी कर्ज वाटप केले होते. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधानंतर खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज वाटप बंद झाले. २०१५ च्या हंगामात कर्ज वाटप बंद होते. शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतून अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज मिळते. त्यामुळेच शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणून या बँकेला मान्यता आहे. एक लाखापर्यंत बँकेचा व्याजदर शून्य टक्के आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे कर्जाची मागणी केली तेव्हा त्यांना विविध कागदपत्रांच्या मागणीमुळे त्रास झाला. त्यातच शिक्षकांचे खाते अन्य बँकेत सुरू झाल्यामुळे त्यांचीही ओव्हरड्राफ्ट मिळविण्यात पंचाईत झाली. त्यामुळे जिल्हा बँक तातडीने सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे लावून धरली होती. आता शेतकऱ्यांना सुलभरीत्या कर्ज मिळणार आहे. (प्रतिनिधी)कर्ज फेडणाऱ्यांनाच कर्ज१४ मार्च २०१६ ला बँकेला आर्थिक परवाना मिळाल्यानंतर बँकिंग व्यवहाराला वेग आला आहे. नागपूर भागातील शेतकऱ्यांना आता बँकेच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. अनेकांना वेळोवेळी कर्जेही उपलब्ध होतील. आॅक्टोबरपर्यंत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात येणार आहे. पूर्वी कर्जाचा भरणा केलेल्या वा आता करीत असलेल्यांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. प्रारंभी जवळपास १०० कोटींचे, नंतर ५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एक लाखापर्यंत शून्य टक्के आणि दोन लाखांपर्यंत दोन टक्के व्याजदराने कर्जवाटप होणार आहे.