शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

अशांतता पसरविणाऱ्यांचा नीट बंदोबस्त करू; गृहमंत्र्यांचा नागपुरात इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 05:59 IST

वळसे-पाटील म्हणाले,  अमरावती, अकोटमध्ये काय घडले याची पोलीस चौकशी करीत आहेत. या भागांत दंगली घडत आहेत. एका विशिष्ट परिसरामध्ये या सर्व घटना घडतात.

नागपूर:  देशात वेगवेगळ्या कारणांवरून जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रात सातत्याने अशांतता पसरविण्याचे काम केले जात आहे. काही लोक त्यात सामील आहेत. अशा लोकांचा योग्य बंदोबस्त केला जाईल, असा सज्जड इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी नागपुरातून दिला. 

पत्रकारांशी बोलताना -वळसे-पाटील म्हणाले,  अमरावती, अकोटमध्ये काय घडले याची पोलीस चौकशी करीत आहेत. या भागांत दंगली घडत आहेत. एका विशिष्ट परिसरामध्ये या सर्व घटना घडतात.  म्हणजे तिथे काही घटक ॲक्टिव्ह आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त स्तरावर बैठक होईल. मग परत एकदा मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ, असेही वळसे-पाटील म्हणाले.

३ मेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज  -कायदा व सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही.  कुठल्याही वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होत असेल, अशांतता निर्माण होत असेल अशी कोणतीही कृती कारवाईस पात्र ठरते. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.    - दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री 

केंद्राने सुरक्षा देणे हे राज्यावर अतिक्रमण -केंद्र सरकारकडून काहींना सुरक्षा पुरविली जात आहे.  राज्य सरकारच्या सार्वभौम अधिकाराला बाजूला सारून काही व्यक्तींना सुरक्षा पुरविली जाते, हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, अशी टीका त्यांनी केली. 

तेव्हा भाजपने का नाही हटविले भोंगे : तोगडिया -भाजपशासित राज्यांतील भोंग्यांबाबत मौन बाळगून महाराष्ट्रात आंदोलनाची भाषा सुरू आहे. सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत, असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की, रात्री १० नंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. याचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित आहे.

राज ठाकरेंचे समर्थन भाजपसाठी धोक्याचे : आठवले -मनसेची भूमिका ही अतिहार्ड असून, ही हार्ड भूमिका घेऊन भाजपला फायदा होणार नाही. राज ठाकरे यांचे समर्थन घेणे राजकीय पातळीवर भाजपला महागात पडेल, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येथे मंगळवारी म्हणाले. भाजप आणि मनसेची युती होऊच शकत नाही. रिपाइं पक्ष भाजपसोबत असताना त्यांना मनसेची गरज नाही, असेही ते म्हणाले.

मुंबईत ७२% मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद -राज्यात भोंग्याचा प्रश्न तापला असताना, मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ७२ टक्के मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद केला असल्याची माहिती समोर आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलnagpurनागपूरRamdas Athawaleरामदास आठवले