शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

उर्ध्व वर्धा कालव्यालगतची जमीन शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:18 PM

उर्ध्व वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली शिल्लक राहिलेली जमीन तात्पुरत्या स्वरुपात खरीप व रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर देण्यात येत आहे. शेतकºयांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाने केले आहे.

ठळक मुद्दे३० जूनपर्यंत मागविले अर्ज

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : उर्ध्व वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली शिल्लक राहिलेली जमीन तात्पुरत्या स्वरुपात खरीप व रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर देण्यात येत आहे. शेतकºयांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाने केले आहे.उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे जलग्रहण क्षेत्र ४३०२ चौरस किमी आहे. या प्रकल्पाचे दोन कालवे असून उजवा कालवा ९५.५० किमी व डावा कालवा ४२.४० किमी आहे. या कालव्याकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली जमीन शिल्लक आहे. ही जमीन पाटबंधारे विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात शेतीसाठी देण्यात येत आहे. यामध्ये प्रकल्पबाधित व्यक्ती, भूमिहीन, मागासवर्गीय सहकारी संस्था, मागासवर्गीयेतर भूमिहीन व्यक्तींची सहकारी संस्था, भूमिहीन व्यक्तींच्या सहकारी संस्था, मागासवर्गीय भूमिहीन अर्ज सादर करून शकतात.पात्र लाभार्थी कुटुंबाला १.२० हेक्टर जमीन भाडेपट्टीवर देण्यात येईल. कुटुंबप्रमुख सहकारी संस्थेचा सदस्य असल्यास मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६ नुसार १.६ हेक्टर इतकी जमीन देण्यात येईल. एका वर्षात दोन पिके घेतल्यास अर्जदारास ११ महिने कालावधीसाठी प्रति हेक्टरी २ हजार रुपये तसेच एका पिकासाठी प्रति हेक्टरी १ हजार रुपये व आवश्यक दस्तावेजासमवेत उपविभागीय अधिकारी, उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र.१, मोर्शी येथे ३० जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर