शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय पद्व्युत्तर अभ्यासक्रमात ४९३ जागांचे नुकसान

By admin | Updated: June 5, 2017 18:01 IST

राज्यातील खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेत आरक्षीत प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या ४९३ जागा भरण्यात आलेल्या नाहीत.

मिलिंद कीर्ती चंद्रपूर : राज्यातील खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेत आरक्षीत प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या ४९३ जागा भरण्यात आलेल्या नाहीत. ही प्रवेश प्रक्रिया राबविताना संवैधानिक कोट्यानुसार आरक्षण देण्यात आले नाही. याबाबत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे.राज्यामध्ये ४५ शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यामधील पद्व्युत्तर अभ्यासक्रम एम.डी. व एम.एस. आणि पद्व्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २३४० जागा आहेत. त्यापैकी अखिल भारतीय कोट्यातील ५३२ जागा आहेत. उर्वरित १८०८ जागा राज्यातील विद्यार्थ्यांकरिता आहेत. या जागा संवैधानिक धोरणानुसार प्रत्येक प्रवर्गातून भरणे आवश्यक होते. परंतु त्या कोट्यानुसार जागांचे वितरण करण्यात आले नसल्याची तक्रार वर्धा येथील गोकुल पांडे यांनी केली आहे. २००६मधील सुधारित धोरणानुसार वैद्यकीय शिक्षण संचालकांनी (डीएमईआर) खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांना कोटा प्रदान केला नाही. या असंवैधानिक निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोपही पांडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.२०१६ मधील ‘नीट’च्या गुणवत्ता यादीवर आधारित एम.डी., एम.एस., पी.जी. डिप्लोमा आदी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्याकरिता २९, ३० व ३१ मे २०१७ रोजी ‘मॉप अप राऊंड’ नुसार बहुसंख्य प्रवेश देण्यात आले. २००६ मध्ये भारतीय संविधानात ९३वे संशोधन करून पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आरक्षण धोरण लागू करण्यात आले आहे. त्याची पालमल्ली करून राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पद्व्युत्तर अभ्यासक्रमांकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे.----वैद्यकीय अभ्यासक्रमात नुकसान प्रवर्ग जागाओबीसी१९९अनु. जाती१०९अनु. जमाती६२व्ही. जे.३५एन.टी.१३२एन.टी.२३७एन.टी.३१९एकूण४९३पद्व्युत्तर प्रवेश दिलेले विद्यार्थीप्रवर्ग जागाओबीसी१४५अनु. जाती१२६अनु. जमाती६५व्ही. जे.१९एन.टी.११३एन.टी.२२६एन.टी.३१७एकूण४११संवैधानिक आरक्षण धोरणानुसार महाराष्ट्रात पद्व्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत घोळ घालण्यात आला आहे. शासनाने तातडीने अन्याय दूर न केल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.-गोकुल पांडे, तक्रारकर्ते, वर्धा.