शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कोसळधार

By admin | Updated: July 23, 2014 01:02 IST

उपराजधानीत रविवारी दुपारपासून संततधार पावसाचा जोर मंगळवारी दिवसभर कायम होता. गेल्या ३६ तासांत नागपूर जिल्ह्यात ११९.६ मिमी.पावसाची नोंद करण्यात आली आहे.

३६ तासांत ११९.६ मिमी पाऊसनागपूर : उपराजधानीत रविवारी दुपारपासून संततधार पावसाचा जोर मंगळवारी दिवसभर कायम होता. गेल्या ३६ तासांत नागपूर जिल्ह्यात ११९.६ मिमी.पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाने झोडपल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यात जवळपास अशीच स्थिती असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार उपराजधानीत मंगळवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत ७७.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली . सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवार सकाळपर्यंत ४२.२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला होता. येत्या २४ तासांत आणखी मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)१३ फिडर्सवर ब्रेकडाऊन मुसळधार पावसाचा सामान्य नागरिकांसोबतच स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडलाही (एसएनडीएल) फटका बसला. पाऊस व वाऱ्यामुळे दिवसभरात १३ फिडर्सवर ब्रेक डाऊन झाला. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वांजरा फिडरवर ४० मिनिटांचे ब्रेकडाऊन झाले होते. यामुळे अन्सारी प्लास्टिक कंपनी व डांबर फॅक्टरी परिसरातील वीजपुरवठा प्रभावित झाला होता. तसेच लाडीकर ले-आऊट, बिनाकी व बिजलीनगर येथील फिडर्सवरही ब्रेकडाऊन झाले होते. शिवाय सायं. ६ वाजताच्या सुमारास मानकापूर सबस्टेशनवर स्पार्क झाल्याने अचानक नऊ फिडर्सवर ब्रेकडाऊन झाले होते. यामुळे काटोल रोड, सदर, आरबीआय चौक, सिव्हिल लाईन्स व धरमपेठ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. एसएनडीएलची चमू रात्री उशिरापर्यंत या सर्व फिडर्सवरील बिघाड दूर करून, वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत होती. विमान मुंबईला परतलेवाईट हवामानामुळे वातावरणामुळे एअर इंडियाचे ६२९ क्रमांकाचे विमान नागपूरच्या आकाशात येऊन पुन्हा मुंबईकडे परतले. यामुळे परतीच्या प्रवासात या विमानाने मुंबईला जाणाऱ्या ६२ प्रवाशांवर रात्री उशिरापर्यंत विमानतळावर ताटकळत बसण्याची पाळी आली. दरम्यान प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. एअर इंडियाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची भोजनाची व्यवस्था केली. रात्री उशिरापर्यंत मुंबईवरून पुन्हा विमान आल्यास परत जा, प्रवासाचे पैसे परत घ्या किंवा सकाळी असलेल्या ८.३० वाजता एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला जा असे पर्याय प्रवाशांपुढे ठेवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मुंबईवरून विमान येणार आहे की नाही, याची माहिती प्रवाशांना देण्यात आली नव्हती.रेल्वेगाड्या लेट सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. दरम्यान, उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होऊन त्यांना रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली होती. दरम्यान, उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२२९५ बंगळूर-पटना संघमित्रा एक्स्प्रेस ३.१५ तास, २२३५२ यशवंतपूर-पाटलीपुत्र एक्स्प्रेस १.४० तास, १२७९२ पटना -सिकंदराबाद एक्स्प्रेस ३ तास, १२२९६ पटना-बंगळूर संघमित्रा एक्स्प्रेस ३ तास, १२९९४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस १.१५ तास आणि १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस २ तास या गाड्यांचा समावेश आहे. उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे वेटिंग रूम हाऊसफुल्ल होऊन प्लॅटफॉर्मवरही प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळाली.एसटीच्या फेऱ्या रद्दपावसामुळे नागपूर जिल्ह्यातील वाहतूकही काही ठिकाणी विस्कळीत होऊन एस. टी. महामंडळाला आपल्या काही फेऱ्या रद्द करण्याची पाळी आली. यात रामटेक-भंडारा, रामटेक-तुमसर हा मार्ग दुपारी १२ नंतर बंद करावा लागला. अरोलीजवळ रस्त्यावर नाल्याचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यात एसटी महामंडळाला आपल्या १२ फेऱ्या रद्द करण्याची पाळी आली. याशिवाय जिल्ह्यात चिमूर, भिसी मार्गावरील वाहतूकही बंद झाली. उमरेड-जवळीच्या ६ फेऱ्या, उमरेड भिसीच्या ८ फेऱ्या, उमरेड-चिमूरच्या १२ फेऱ्या, उमरेड-तारणाच्या १२ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. बालाघाटजवळ रजेगाव येथेही रस्त्यावर पाणी आल्यामुळे नागपूर-रजेगाव ही फेरी आंजी-आमगाव या मार्गाने वळविण्याचा निर्णय एसटी महामंडळाला घ्यावा लागला.