शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

कोरोनासोबतच काढाही ‘रिटर्न्स’; रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकडे लोकांचा वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:09 AM

Nagpur News लोकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पुन्हा घरगुती उपाय सुरू केले आहेत. यात काढा ‘रिटर्न्स’ झाला आहे.

ठळक मुद्देआयुर्वेदिक काढ्याच्या मागणीत वाढ

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाचा प्रभाव आता आणखी वाढू लागला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील चार दिवसांतच २८१६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून उपाययोजना हाती घेतल्या आहेत. लोकांनीही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पुन्हा घरगुती उपाय सुरू केले आहेत. यात काढा ‘रिटर्न्स’ झाला आहे.

नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या १,४३,८४३ वर गेली आहे. मागील सात दिवसांपासून रोज ५००वर नव्या रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसण्यासाठी प्रशासनाने शाळा-कॉलेज, आठवडी बाजार ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. किराणा वस्तूंचा तुटवडा होईल या भीतीने लोकांनी घरी जास्तीचा किराणा भरणे सुरू केले आहे. परिणामी, दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जशी स्थिती निर्माण झाली तेवढी बिकट नसली तरी तसे चित्र दिसून येऊ लागले आहे. दिवसाची सुरुवात काढ्यापासून होत आहे. दालचिनी, तुळस, काळीमिरी, सुंठ आदींचा उपायोग काढा बनविण्यासाठी होऊ लागला आहे. ज्यांना घरगुती काढ्यावर विश्वास नाही ते आयुर्वेदिक डॉक्टरांकडून काढा घेत आहेत. तर काही रेडिमेड काढा विकत घेताना दिसून येत आहे. दरम्यानच्या काळात काढ्यामुळे नानाविध शंका निर्माण झाल्या होत्या. यावर आयुष मंत्रालयाने जेवण तयार करण्याठी उपयोगात येणाऱ्या वस्तूपासून तयार केलेला काढा तयार केल्यास त्याचा कुठलाही दुष्परिणाम होत नसल्याचे म्हटले आहे. परंतु विकत घेऊन आणलेल्या काढ्याचे किंवा त्याच्या अतिसेवनाचे वाईट परिणामही दिसून आले आहे. आता पुन्हा कोरोनाचा वेग वाढल्याने लोकांनी काढा घेणे सुरू केल्याने काढ्याचे परिणाम व दुष्परिणामांवर चर्चा होऊ लागली आहे.

-रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काढा उत्तमच

स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या पदार्थांपासून तयार करण्यात आलेला काढा, विशेषत: दालचिनी, तुळस, काळी मिरी, सुंठ यांपासून तयार केलेला काढा आरोग्यदायी आहेच. वात, पित्त व कफ नियंत्रणात ठेवण्यासाठी काढा महत्त्वाचा आहे. परंतु तो घेताना प्रकृती व काढा घेण्याचे प्रमाण याकडे लक्ष द्यायला हवे. शक्य झाल्यास काढा तयार करताना आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास फायदाच होतो.

- डॉ. मोहन येंडे

आयुर्वेदिकतज्ज्ञ

-रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

आपल्याला रोजच्या जेवणातून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे घटक मिळतच असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे की क्षीण झाली आहे याचा निर्णय डॉक्टरांना घेऊ द्या. राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी चांगला आहार घ्या, व्यायाम करा. काढ्याच्या अतिसेवनामुळे दरम्यानच्या काळात मूळव्याधीचे रुग्ण वाढले होते. आजही होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना याचा त्रास होत आहे. अशा रुग्णांवर टेलिमेडिसीनद्वारे उपचार केला जात आहे.

-डॉ. नीलेश जुननकर

गुदारोग तज्ज्ञ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस