शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

हा शालेय शिक्षण आराखडा की धार्मिक शिक्षण?

By निशांत वानखेडे | Updated: June 1, 2024 18:54 IST

मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे टीका : अनिष्ट कला, वादग्रस्त श्लोक गाळण्याची मागणी

नागपूर : राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने सादर केलेल्या राज्य शैक्षणिक व शालेय शिक्षण आराखडा २०२४ ला समाजाच्या सर्वच स्तरातून विराेध हाेत आहे. या आराखड्यावरून साहित्यिक व मराठी अभ्यासकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. मनुस्मृतीचे वादग्रस्त श्लाेक व इतर गाेष्टींचा समावेश केल्याने हा शाेलय शिक्षण आराखडा आहे की धार्मिक शिक्षण, अशी राेखठाेक टीका मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ व महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयाेजक श्रीपाद भालचंद्र जाेशी यांनी केली आहे.

श्रीपाद जाेशी यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि शाेलय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून आराखड्यातून वादग्रस्त श्लाेक आणि अनिष्ट कलांचे शिक्षण काढून टाकण्याची मागणी केली आहे. भारत हा बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक आणि सर्वसमावेश देश आहे. अशा देशात एका विशिष्ट धर्माच्या शिक्षणाचा समावेश करणे, याेग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यापेक्षा सर्व धर्मांची नैतिक मूल्यांचा अंतर्भाव त्यात करावा व मनुस्मृतीचे वादग्रस्त श्लाेक हटविण्यात यावे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे सर्वसमावेशक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक भारतीयतेचा आणि राज्यघटनेतील तत्त्वांचा संस्कार शैक्षणिक आराखड्यात करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. भारतीय ज्ञान वारसा शिकविताना महाराष्ट्रातील संतांसोबतच भक्ती कालखंडातील कबीर, रहीम, चैतन्य महाप्रभू, मीरा यासारख्या संतांचा समृद्ध वारसाही नेमला जावा. याशिवाय बौद्ध, जैन, शीख, ख्रिस्त आणि इस्लाम धर्मातील नैतिक मूल्यांचे संस्कार, विनोबांची समश्लोकी मराठी ‘गीताई’, राष्ट्रसंतांची 'ग्रामगीता यात अंतर्भूत करावी, अशी सुचना त्यांनी दिली.

मुलांना या कला शिकविणार का?या आराखड्यामध्ये कलाशिक्षण प्रकरणात ललितकलांची यादी मुनी वास्यायन यांच्या कामाशास्त्रावरून घेतली आहे. छलीक योग (चलाखी करून हातोहात फसवणे), द्युतक्रीडा (जुगार खेळणे), इंद्रजाल (गारूडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे) अशा कलांचा त्यात अंतर्भाव आहे. या कालबाह्य कलांना वगळून आधुनिक काळाशी सुसंगत अशी ललित कलांची यादी समाविष्ट करावी.

राज्याच्या शालेय शिक्षणाच्या आराखड्याला झालेला विरोध लक्षात घेता मुळात केवळ तिसरी ते पाचवी असा तीनच वर्ष अनिवार्य असलेला मराठी विषय पहिली ते दहावी अनिवार्य करणारा दुरूस्त आराखडा पत्रक परिषदेने काढले असले तरी अद्यापही बारावी पर्यंत मराठी अनिवार्य करण्याची दुरूस्ती टाळून, मराठी भाषा धोरणाची जी पायमल्ली या आराखड्यात झाली आहे ती दूर करावी.- श्रीपाद भालचंद्र जाेशी, संयाेजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी

लैंगिक शिक्षणा अंतर्भाव करावा- माेबाईलमुळे लहान मुलांना वाईट पद्धतीने विकृत स्वरुपात लैंगिक ज्ञान हाती येत आहे. त्यामुळे स्त्री पुरुष समानता, नकाराचा अधिकार, गुड टच / बॅड टच आणि निकोप भिन्नलिंगी मैत्री सांगणारे लैंगिक शिक्षण मिळावे.- भारतीय संविधान ही भारतीय लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यत्रयीचे तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळे संविधान शिक्षणाचा अंतर्भाव असावा.- वैज्ञानिक दृष्टीकाेण विकसित हाेईल, असे शिक्षण.- शाळेत कलांगण व क्रिडांगण असावे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणnagpurनागपूर