शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक कॉलनींना आता घरगुती दरानेच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 14:35 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्य श्वेताली ठाकरे यांनी दिली माहिती

नागपूर : महाराष्ट्रात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आता निवासी औद्योगिक कॉलनींना घरगुती दराने पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (एमएडब्ल्यूआरआरए) च्या सदस्य (अर्थतज्ज्ञ) श्वेताली ठाकरे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अशाच प्रकारे राज्यातील पाण्याच्या स्रोतवार दरांमध्येही एकरूपता आणली असल्याचे त्या म्हणाल्या.

श्वेताली ठाकरे या लोकमतशी विशेष चर्चा करताना बोलत होत्या. त्या म्हणाल्या की प्राधिकरणचे राज्याला शाश्वत व स्थायी जलसुरक्षा प्रदान करण्याचे लक्ष्य पुढे ठेवून काम करीत आहे. त्याचबरोबर पाणी दराचेही निर्धारण करीत आहे. २०२२ मध्ये प्राधिकरणाने २०२५ पर्यंत पाण्याचे दर निश्चित केले आहे. यात उद्योगांसाठी विशेष तरतूद केली आहे. सिंचनासाठी प्रति एकर एक हजार लिटर १५ पैसे दर निश्चित करण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठी सरासरी ६२ पैसे एक हजार लिटर व उद्योगासाठी १३ रुपये प्रति एक हजार लिटर दर निश्चित केले आहेत. उद्योगांना ७५ टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जात आहे. त्याचबरोबर उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या कॉलनींना घरगुती दरात पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट केले की केवळ पाणीपुरवठ्याचाच पैसा घेतला जात आहे, त्यातून कुठलाही लाभ कमविल्या जात नाही. त्या म्हणाल्या की पाण्याच्या दरांच्या बाबतीत प्राधिकरणाने अभ्यास सुरू केला आहे. एसटीपी व ईटीपी परिणामांवर मंथन करण्यात येणार आहे. यासाठी सरकारच्या अन्य एजन्सीचीही मदत घेण्यात येत आहे.

- कमी झाले दर

श्वेताली ठाकरे म्हणाल्या की राज्यात प्रत्येक नागरिकाला माफक दरात पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधिकरण कटिबद्ध आहे. प्राधिकरणाचे गठण झाल्यानंतरच पाण्याच्या दरात सवलती मिळाल्या आहेत. उत्पन्नाच्या बाबतीत बोलायचे तर घरगुती पाण्यासाठी २ ते ३ टक्के व उद्योगासाठी १ टक्के खर्च येतो. सिंचनासाठी ७५ टक्के सबसिडी दिली जात आहे. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवारसारख्या योजनांवर काम सुरू आहे. त्याचबरोबर पाण्यासंदर्भातील वादविवादही कमी झाले आहे. आता वर्षाला पाण्यासंदर्भातील १५ ते २० प्रकरण प्राधिकरणाकडे येतात.

- टिश्यूपेपरने नव्हे, पाण्याने करावे हात स्वच्छ

श्वेताली ठाकरे यांनी पाणी बचत करणे व पाण्याचा अतिरेक थांबविण्यावर जोर दिला. त्यांनी आवाहन केले की टिश्यू पेपरने नाही, तर पाण्यानेच हात साफ करावे. टिश्यू पेपर बनविण्यासाठी भरपूर पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे पाण्याने हात धुतल्यास पाण्याची बचत होईल. त्याचबरोबर आपल्या दिनचर्येत आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :WaterपाणीnagpurनागपूरGovernmentसरकार