शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

औद्योगिक कॉलनींना आता घरगुती दरानेच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 14:35 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्य श्वेताली ठाकरे यांनी दिली माहिती

नागपूर : महाराष्ट्रात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आता निवासी औद्योगिक कॉलनींना घरगुती दराने पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (एमएडब्ल्यूआरआरए) च्या सदस्य (अर्थतज्ज्ञ) श्वेताली ठाकरे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अशाच प्रकारे राज्यातील पाण्याच्या स्रोतवार दरांमध्येही एकरूपता आणली असल्याचे त्या म्हणाल्या.

श्वेताली ठाकरे या लोकमतशी विशेष चर्चा करताना बोलत होत्या. त्या म्हणाल्या की प्राधिकरणचे राज्याला शाश्वत व स्थायी जलसुरक्षा प्रदान करण्याचे लक्ष्य पुढे ठेवून काम करीत आहे. त्याचबरोबर पाणी दराचेही निर्धारण करीत आहे. २०२२ मध्ये प्राधिकरणाने २०२५ पर्यंत पाण्याचे दर निश्चित केले आहे. यात उद्योगांसाठी विशेष तरतूद केली आहे. सिंचनासाठी प्रति एकर एक हजार लिटर १५ पैसे दर निश्चित करण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठी सरासरी ६२ पैसे एक हजार लिटर व उद्योगासाठी १३ रुपये प्रति एक हजार लिटर दर निश्चित केले आहेत. उद्योगांना ७५ टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जात आहे. त्याचबरोबर उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या कॉलनींना घरगुती दरात पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट केले की केवळ पाणीपुरवठ्याचाच पैसा घेतला जात आहे, त्यातून कुठलाही लाभ कमविल्या जात नाही. त्या म्हणाल्या की पाण्याच्या दरांच्या बाबतीत प्राधिकरणाने अभ्यास सुरू केला आहे. एसटीपी व ईटीपी परिणामांवर मंथन करण्यात येणार आहे. यासाठी सरकारच्या अन्य एजन्सीचीही मदत घेण्यात येत आहे.

- कमी झाले दर

श्वेताली ठाकरे म्हणाल्या की राज्यात प्रत्येक नागरिकाला माफक दरात पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधिकरण कटिबद्ध आहे. प्राधिकरणाचे गठण झाल्यानंतरच पाण्याच्या दरात सवलती मिळाल्या आहेत. उत्पन्नाच्या बाबतीत बोलायचे तर घरगुती पाण्यासाठी २ ते ३ टक्के व उद्योगासाठी १ टक्के खर्च येतो. सिंचनासाठी ७५ टक्के सबसिडी दिली जात आहे. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवारसारख्या योजनांवर काम सुरू आहे. त्याचबरोबर पाण्यासंदर्भातील वादविवादही कमी झाले आहे. आता वर्षाला पाण्यासंदर्भातील १५ ते २० प्रकरण प्राधिकरणाकडे येतात.

- टिश्यूपेपरने नव्हे, पाण्याने करावे हात स्वच्छ

श्वेताली ठाकरे यांनी पाणी बचत करणे व पाण्याचा अतिरेक थांबविण्यावर जोर दिला. त्यांनी आवाहन केले की टिश्यू पेपरने नाही, तर पाण्यानेच हात साफ करावे. टिश्यू पेपर बनविण्यासाठी भरपूर पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे पाण्याने हात धुतल्यास पाण्याची बचत होईल. त्याचबरोबर आपल्या दिनचर्येत आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :WaterपाणीnagpurनागपूरGovernmentसरकार