शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कोविड ब्रॉड डेडच्या संख्येत वाढ; रुग्णालयात येण्यापूर्वीच २१ कोरोनाबाधितांना मृत्यूने गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:18 PM

Corona Nagpur News मागील सात दिवसात रुग्णालयात येण्यापूर्वीच २१ कोरोनाबाधितांना मृत्यूने गाठल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

ठळक मुद्देसात दिवसातील धक्कादायक वास्तव

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही दिवसापासून नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु मागील सात दिवसात रुग्णालयात येण्यापूर्वीच २१ कोरोनाबाधितांना मृत्यूने गाठल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. उशिरा निदान, अनियंत्रित जुना आजार व रुग्णालयात आणण्यास उशीर हे या मागचे कारण असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, मृतांमध्ये २० ते ५० वयोगटाच्या आतील १२ रुग्ण होते.कोविड रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्याची भीतीही ओसरु लागली आहे. यामुळे लोकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. लक्षणांना गंभीरतेने घेतले जात नाही. आजार गंभीर झाल्यावर रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत असताना एकतर घरीच किंवा वाटेतच मृत्यू होत आहे, म्हणजे 'ब्रॉड डेड' होत आहे. मेडिकलमध्ये १३ ते १९ ऑक्टोबर या सात दिवसात तीन महिलेसह १८ पुरुष 'ब्रॉड डेड' आले आहेत. यात तरुण रुग्णांची संख्या मोठी आहे.अडीच महिन्यात २३९ 'ब्रॉड डेड' प्रकरणप्राप्त माहितीनुसार, मेडिकलमध्ये मागील अडीच महिन्यात जवळपास २३९ ह्यब्रॉड डेडह्ण प्रकरण सामोर आली आहेत. यात ऑगस्ट महिन्यात ४६७ रुग्णांमधून सुमारे ८२, सप्टेंबर महिन्यात ५५३ मृतांमधून ११७ तर ऑक्टोबर महिन्यातील मागील १८ दिवसात १५० मृतांमधून साधारण ४० प्रकरणे आहेत.१६ मृत नागपूर जिल्ह्यातीलमेडिकलमध्ये १३ ऑक्टोबर रोजी चार, १४ ऑक्टोबर रोजी दोन, १५ ऑक्टोबर रोजी पाच, १६ ऑक्टोबर रोजी ४, १७ ऑक्टोबर रोजी ३, १८ ऑक्टोबर रोजी १ तर १९ ऑक्टोबर रोजी २ रुग्ण मृत अवस्थेत (ब्रॉड डेड) आले. यात नागपूर जिल्ह्यातील १६ आहेत. शिवाय, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक आहे. तर मध्य प्रदेशातील तीन मृत आहेत. या सर्वांची चाचणी कोविड पॉझिटिव्ह होती.वेळेत निदान व रुग्णालयात पोहचणे आवश्यकलक्षणांकडे दुर्लक्ष करणे, आजार अंगावर काढणे, वेळेत निदान न होणे व रुग्णालयात उशिरा आणणे हे 'कोविड ब्रॉड डेड' प्रकरणातील काही कारणे असू शकतात. यात आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जुन्या अनियंत्रित आजाराकडे दुर्लक्ष. यामुळे लक्षणे दिसताच वेळेत निदान करून उपचार घेणे आवश्यक आहे.-डॉ. प्रशांत पाटीलप्राध्यापक, मेडिसीन विभाग, मेडिकल

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस