शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

गोसेखुर्दसह २५ वन प्रभावित सिंचन प्रकल्प जून २०२२ पर्यंत पूर्ण होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 18:57 IST

गोसेखुर्दसह २५ वन प्रभावित सिंचन प्रकल्पांचे काम जून-२०२२ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. महामंडळाच्या नागपूर विभागाचे अधीक्षक अभियंता जे. जी. गवळी यांनी बुधवारी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले.

ठळक मुद्देहायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्दसह २५ वन प्रभावित सिंचन प्रकल्पांचे काम जून-२०२२ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. महामंडळाच्या नागपूर विभागाचे अधीक्षक अभियंता जे. जी. गवळी यांनी बुधवारी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले.डिसेंबर-२०१८ पर्यंत बावनथडी व बोरघाट, मार्च-२०१९ पर्यंत सत्रपूर, खडकपूर्णा व येंगलखेडा, जून-२०१९ पर्यंत झासीनगर, पळसगाव, नागठाणा व पांढवाणी, डिसेंबर-२०१९ पर्यंत तुरागोंडी व चांदस वाठोडा, जून-२०२० पर्यंत शिरुर, नवेगाव, कोसारी, धापेवाडा, कोहळ, लोवर वर्धा व बोर्डी नाला, जून-२०२१ पर्यंत लखमापूर, लोवर चारगड, गोंडेगाव व पांढरी, डिसेंबर-२०२१ पर्यंत गोसेखुर्द तर, जून-२०२२ पर्यंत बेंडारा व हळदीपुराणी प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाईल. गोसेखुर्दसाठी २१ सप्टेंबर २०१६ रोजी १८ हजार ४९४.५७ कोटी रुपये खर्चाला सुधारित मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प वेगात पूर्ण करण्यासाठी १०५८ कोटी रुपयांचे काम नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनला देण्यात आले, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.यासंदर्भात लोकनायक बापुजी अणे स्मारक समितीची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, समितीने या प्रतिज्ञापत्रावर प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला. विदर्भातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात यावेत, अशी समितीची मागणी आहे. समितीतर्फे अ‍ॅड. अविनाश काळे तर, महामंडळातर्फे अ‍ॅड. व्ही. जी. पळशीकर यांनी कामकाज पाहिले.प्रकल्पांना यामुळे होतो विलंबपुढील कारणांमुळे सिंचन प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नसल्याचे महामंडळाने न्यायालयाला सांगितले.

  •  प्रकल्प पीडितांचा विरोध.
  •  निधी वेळेवर उपलब्ध न होणे.
  •  विविध परवानग्या वेळेवर न मिळणे.
  •  प्रकल्पांची सिंचन क्षमता वाढविणे.
  •  बांधकाम साहित्य उपलब्ध नसणे.
  •  तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे.

या प्रकल्पांचे काम पूर्ण झालेमहामंडळानुसार आतापर्यंत ४५ पैकी पुढील १३ वन प्रभावित सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

  •  केकतपूर, जि. अमरावती.
  •  शहापूर, जि. अकोला.
  •  उंदरी, जि. वाशीम
  •  भिवकुंड, जि. नागपूर.
  •  पिंपळगाव, जि. नागपूर.
  •  चोपान, जि. यवतमाळ.
  •  झरांडी, जि. अकोला.
  •  किरमिरी दारुर, जि. चंद्रपूर.
  •  हिराबामबाई, जि. अमरावती.
  •  इटियाडोह झारीफरी, जि. गोंदिया.
  • डोंगरगाव, जि. चंद्रपूर.
  •  झोडगा, जि. वाशीम.
  •  सुकळी, जि. अकोला.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प