शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

तर भूसंपादन प्रक्रिया रद्द

By admin | Updated: January 3, 2015 02:25 IST

अवॉर्ड जारी झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत जमीन मालकाला मोबदला न दिल्यास भूसंपादनाची प्रक्रिया आपोआप रद्द होते असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे.

राकेश घानोडे नागपूरअवॉर्ड जारी झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत जमीन मालकाला मोबदला न दिल्यास भूसंपादनाची प्रक्रिया आपोआप रद्द होते असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे. या निर्णयामुळे भूसंपादन झाल्यानंतर मोबदल्याची प्रतीक्षा करीत असलेल्या असंख्य जमीन मालकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर मिळाले आहे.वर्धा येथील एका प्रकरणात शासनाने अवॉर्ड जारी झाल्यानंतर पाच वर्षांत जमीन मालकांना मोबदला दिला नव्हता. यामुळे तीन जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व चंद्रकांत भडंग यांनी याचप्रकरणावर निर्णय देताना वरीलप्रमाणे खुलासा केला. राज्यात १ जानेवारी २०१४ पासून ‘रास्त मोबदला व भूसंपादनात पारदर्शकता, पुनर्वसन व पुन:स्थापना अधिकार कायदा-२०१३’ लागू झाला आहे. कायद्यातील कलम २४ (२) अनुसार भूसंपादनाचा अवॉर्ड जारी झाल्यानंतर जमीन मालकाला पाच वर्षात मोबदला देणे आवश्यक आहे. अन्यथा भूसंपादन प्रक्रिया रद्द होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘श्री बालाजीनगर रहिवासी संघटना वि. तामिळनाडू शासन व इतर’ आणि ‘राम किशन व इतर वि. हरयाणा शासन व इतर’ प्रकरणात ही बाब स्पष्ट केली असल्याचेही उच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)याचिकाकर्त्यांचे प्रकरणविशेष भूसंपादन अधिकाऱ्याने १५ जानेवारी २००२ रोजी कायद्याच्या कलम ११ अंतर्गत याचिकाकर्त्यांना अवॉर्ड जारी केला होता. यानंतर याचिकाकर्त्यांना अनेक प्रयत्न करूनही मोबदला मिळाला नाही. यामुळे त्यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. भूसंपादनाला १२ वर्षे लोटूनही ते मोबदल्यापासून वंचित होते. भूसंपादनाची गरज संपल्यामुळे शासनानेदेखील त्यांची जमीन ताब्यात घेतली नव्हती. जमिनीवर याचिकाकर्त्यांचाच ताबा होता. न्यायालयाने कायद्यातील तरतूद व याचिकेतील तथ्ये पाहता याचिका खारीज केली.