शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दोषी असल्यास टालाटुलेवर कारवाई व्हावी

By admin | Updated: March 9, 2016 03:26 IST

वर्धा जिल्ह्यातील सुमारे ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये थकविणाऱ्या सुनील टालाटुले प्रकरणातील वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच प्रत्युत्तर दिले आहे.

संघाचे आरोपांवर प्रत्युत्तर : काँग्रेसकडून राजकारण करण्यात येत असल्याची टीकानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सुमारे ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये थकविणाऱ्या सुनील टालाटुले प्रकरणातील वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच प्रत्युत्तर दिले आहे. सुनील टालाटुले यांनी शेतकऱ्यांशी केलेले आर्थिक व्यवहार हे वैयक्तिक आहेत. टालाटुले जर दोषी असेल तर कायद्यानुसार कारवाई व्हायलाच हवी, असे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात संघावर चिखलफेक करून काँग्रेसने विकृत राजकारण केले असल्याची टीका महानगर संघचालक राजेश लोया यांनी केली आहे.सुनील टालाटुले नावाचा हा कापूस व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहे. त्याने ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटीहून अधिक रुपये थकविले. यामुळे शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. टालाटुले हा संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे शेतकऱ्यांनी संघावर नाराजी व्यक्त केली होती व २८ फेब्रुवारी रोजी संघ मुख्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न केला होता. ‘भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेस’ या नावाखाली संविधान चौकात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.टालाटुलेंवरून काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रथमच प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. टालाटुलेचे संघाशी संबंध जोडून संघ मुख्यालयावर मोर्चा, उपोषण आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप लावणे चुकीचे आहे. भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसच्या नावावर काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करत असल्याचा आरोप प्रसिद्ध पत्रकातून महानगर संघचालक राजेश लोया यांनी केला आहे.काँग्रेसची ही जुनी मानसिकता या आरोपातून प्रतित होत असल्याचा टोलाही लगावण्यात आला आहे. काँग्रेसचे हे आंदोलन संघाला बदनाम करणारे असून यावेळी स्वयंसेवकांनी संयम राखण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)