शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

स्थलांतरित श्रमिकांसाठी किती रेल्वे चालविल्या; हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 9:43 AM

स्थलांतरित श्रमिकांना आपापल्या घरी जाता यावे याकरिता आतापर्यंत किती रेल्वे चालविण्यात आल्या व त्या रेल्वेंमधून नागपुरातील किती श्रमिकांना पाठविण्यात आले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रेल्वे मंत्रालयाला केली व यावर १९ मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्दे रेल्वे मंत्रालयाला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थलांतरित श्रमिकांना आपापल्या घरी जाता यावे याकरिता आतापर्यंत किती रेल्वे चालविण्यात आल्या व त्या रेल्वेंमधून नागपुरातील किती श्रमिकांना पाठविण्यात आले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रेल्वे मंत्रालयाला केली व यावर १९ मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.प्रकरणावर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शेजारी राज्ये आणि विविध जिल्ह्यांतील हजारो श्रमिक नागपुरात येऊन घरकाम, बांधकाम, वाहनचालक, माळीकाम, रोजमजुरी, किरकोळ वस्तूंची विक्री इत्यादी माध्यमांतून अर्थार्जन करीत होते. त्यातून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार इत्यादींवरचा खर्च भागत होता. परंतु, कोरोना नियंत्रणासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार हिरावला गेला. अर्थार्जन बंद झाले. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. इतर खर्च भागवणेही अशक्य झाले. सरकारने त्यांना घरी पोहचवून देण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलली नाहीत. परिणामी, स्थलांतरित श्रमिकांचा संयम सुटला व हजारो श्रमिक आपापल्या घरी पोहचण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर त्यांचे खाण्यापिण्यावाचून व आवश्यक सुविधांअभावी होत असलेले हाल पाहून उच्च न्यायालयाने याविषयी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात गेल्या तारखेस रेल्वे मंत्रालयाला प्रतिवादी करून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार, रेल्वेचे वकील अ‍ॅड. नितीन लांबट न्यायालयात हजर झाल्यानंतर वरील आदेश देण्यात आला. न्यायालय मित्र अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.रेल्वे तिकिटांसाठी ५७ कोटीस्थलांतरित श्रमिकांच्या रेल्वे तिकिटांसाठी राज्य सरकारने ५७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. रेल्वे प्रवासाकरिता श्रमिकांकडून पैसे घेतले जात नाहीत. राज्य सरकार रेल्वेला श्रमिकांची यादी देते व आवश्यक तिकिटे खरेदी करते, अशी माहिती सुनावणीदरम्यान न्यायालयाला देण्यात आली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय