शुभांशू यांना २४ तासात १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त दिसतातच कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:43 IST2025-06-30T12:40:13+5:302025-06-30T12:43:13+5:30
Nagpur : याच स्टेशनवर साडे नऊ महिने अडकल्या होत्या सुनीता विल्यम्स

How does Shubanshu see 16 sunrises and 16 sunsets in 24 hours?
निशांत वानखेडे
नागपूर : बुधवारी अवकाशात ड्रोपावलेले भारतीय बु अंतराळवीर शुभांशु शुक्ला गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाजर पोहोचले व अवकाशात त्यांची धर्मती सुरुसुद्धा झाली आहे. या स्थानकावर शुभांशू १४ दिवस मुक्कामी आहेत. या १४ दिवसांत आपण १४ सूर्योदय व १४ सूर्यास्त पाहू, पण शुभांशू यांना एकाच दिवसात १६ सुर्योदय व १६ सूर्यास्त बघायला मिळत आहेत. हे कसे होते, हा प्रश्न तुम्हाला पडताच असेल, हो की नाही?
खगोल अभ्यासक प्रभाकर दौड यांच्याकडून याचे उत्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला एक वर्ष म्हणजे ३६५ दिवस लागतात, पण स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायला २४ तास म्हणजे एक दिवस व एक राज लागते. म्हणजे आपण पृथ्वीठरची माणसे एका दिवसात एक सूर्योदय व एक सूर्यास्त पाहतो, आता आपल्याला अवकाशातील या अंतराळ स्थानकाविषयी माहिती असायला हवी. हे अंतराळ केंद्र २७,५०० किलोमीटर प्रतितास या वेगाने पृथ्वीभोवती फिरते आहे. या ठेगाने पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला २० ते २५ मिनिटे म्हणजे फार फार तर दीड तास लागतो. हा कमी अधिक तेल केंद्राच्या तिषुततृत्त, कर्कवृत्त किंता छुतावरून मार्गक्रमण करताना होतो.
दीड तासात एक प्रदक्षिणा म्हणजे ४५ मिनिटात एका बाजूला दिवस व दुसऱ्या ४५ मिनिटात रात्र अनुभवायला मिळते. दीड तासात १ यानुसार हे केंद्र २४ तासात पृथ्वीभोवती १६ प्रदक्षिणा घालते. याच कारणाने शुभांशु यांना एका दिवसात १५ ते १६ सूर्योदय त तेवढेच सूर्यास्त बघायला मिळतात. याचा अर्थ ते १४ दिवसांत २२४ सूर्योदय व तैवढेच सूर्यास्तही अनुभवणार आहेत.
याच स्टेशनवर साडे नऊ महिने अडकल्या होत्या सुनीता विल्यम्स
चारच महिन्यांपूर्वी भारतीय संशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या याच अंतराळ केंद्रावरून परतल्या आहेत, त्या आठ दिवसांसाठी या केंद्रावर गेल्या होत्या. मात्र, त्यांच्या यानात बिधाड़ आल्याने त्यांना तब्बल साढ़े नऊ महिने या केंद्रावर राहावे लागले होते.
शुभांशूच्या वारीचे महत्त्व
शुभांशू शुक्ला यांना अंतराळात पाठविण्यासाठी भारताला ५८४ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इयो लवकरच गगनयान मोहीम आणि मानवासहित चांद्रयान मोहीम राबविणार आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी शुभांशू अंतराळ केंद्रावर पोहोचले आहेत. शिवाय येत्या काही वर्षात भारत स्वतःचे अंतराळ केंद्र तयार करून अवकाशात स्थापन करणार आहे. २०३० पर्यंतचे हे लक्ष्य होते. मात्र, त्याचा खर्च अवाढव्य असल्याने ही मोहीम २०३५ व्या आसपास होईल, असे सांगण्यात येत आहे.