शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दुरांतोतून तिचा पाय ‘गॅप’मध्ये गेला, क्षणार्धात देवदूताने वर खेचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 13:47 IST

काळजाचा चुकला ठोका : जवाहर सिंहांनी काळाचा डाव हाणून पाडला

नागपूर : मुंबईसाठी निघालेल्या दुरंतो एक्स्प्रेसने गती घेतली अन् आतमध्ये असलेली एक शाळकरी मुलगी लगबगीने खाली उतरण्यासाठी डब्याच्या दाराकडे धावली. फलाटावर पाय ठेवण्याचा तिचा अंदाज चुकला अन् तिचा पाय ट्रेन तसेच फलाटाच्या गॅपमध्ये शिरला. काय आक्रित घडणार, याची कल्पना आल्याने फलाटावरील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, वेळीच एक देवदूत धावला. या देवदूताने तिला मृत्यूच्या जबड्यातून अलगद ओढून घेतले. काही क्षणांचीच वेळ होती, मात्र देवदूत बनून धावलेल्या जवाहर सिंह नामक रेल्वे कर्मचाऱ्याने मृत्यूचा डाव हाणून पाडल्यामुळे त्या मुलीला जीवदान मिळाले.

घटना सोमवारची आहे. नागपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी १२२९० नागपूर - मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रात्री ८.२० ला तयार होती. फलाट क्रमांक ८ वर लागलेल्या या गाडीत सोनाली (वय ३५) नामक महिला प्रवास करणार होती. त्यांना सोडण्यासाठी नातेवाईक पल्लवी (वय ३५) आणि त्यांची मुलगी निधी (वय १४) आल्या होत्या. सोनाली यांचे सामान डब्यात सीटपर्यंत पोहचविण्यासाठी पल्लवी आणि निधीही गाडीत चढल्या.

दरम्यान, नियोजित वेळेला गाडी फलाटावरून सुटली. त्यामुळे निधी लगबगीने डब्याच्या दाराकडे धावली. घाईगडबडीत फलाटावर पाय ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या निधीचा पाय सरळ गाडी आणि फलाटामध्ये असलेल्या गॅपमध्ये गेला. यावेळी आपल्या नातेवाइकांना सोडवण्यासाठी आलेले तसेच दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेत अनेक प्रवासी फलाटावर उभे होते. त्यांनी निधीला दारातून खाली उतरताना बघितले. काय होणार, हे लक्षात आल्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

यावेळी फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान जवाहर सिंह आपले कर्तव्य बजावत होते. त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता विलक्षण गतीने निधीकडे झेप घेतली अन् तिला अलगद आपल्याकडे ओढून घेतले. फलाटावरचे काही प्रवासीही यावेळी धावले आणि त्यांनीही जवाहर यांना मदत केली. दुरांतो एक्स्प्रेस धडधडत निघून गेली, मात्र अनेकांच्या, खास करून निधी आणि तिच्या आईच्या काळजाची धडधड सुरूच होती.

जीवघेणा निष्काळजीपणा

अशा घटना वारंवार अनेक ठिकाणी घडतात. काही जणांचे त्यामुळे प्राण जातात तर नशीब बलवत्तर असलेले काही जण बचावतात. त्यासंबंधाने प्रसारमाध्यमांत वेळोवेळी वृत्तही येते. तरीसुद्धा अनेक जण हा जीवघेणा निष्काळजीपणा करतात. गाडीची वेळ झाल्यानंतर, गाडीचा भोंगा वाजल्यानंतरही अनेक जण गप्पाटप्पा करत असतात आणि गाडी सुटल्यानंतर धावपळ करीत गाडीत चढण्या-उतरण्याचा प्रयत्न करतात. या घटनेत सुदैवाने जवाहर देवदूत बनून आल्याने निधीचा जीव वाचला. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी जवाहर यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेnagpurनागपूर