शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

‘गटार’ने मांडले स्वच्छतादूतांचे दाहक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 01:31 IST

मलविसर्जन ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या विष्टेलाही साफ करणारा, प्रसंगी तो ती डोक्यावर वाहणारा एक समूह समाजात असूनही समाजाबाहेर आहे. तो खरा स्वच्छतादूत आहे, पण त्याला सन्मान तर सोडाच समाजाची अवहेलनाच पदोपदी वाट्याला येते. भुकेसाठी चाललेला कुटुंबाचा आक्रोश थांबावा म्हणून झोपडपट्टीतील मलूल चेहरे हे किळसवाणे काम करीत असतात. जातवास्तवाचे हे ओझे घेऊन नरकयातना भोगणाऱ्या या समूहाचे वास्तव रंगमंचावर मांडणाऱ्या ‘गटार’ या एकांकिकेचा २५ वा प्रयोग मंगळवारी सादर झाला आणि ही दाहकता प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्येक प्रेक्षक स्तब्ध झाला.

ठळक मुद्देएकांकिकेच्या २५ व्या प्रयोगात प्रेक्षक स्तब्ध : कलावंतांचाही सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मलविसर्जन ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या विष्टेलाही साफ करणारा, प्रसंगी तो ती डोक्यावर वाहणारा एक समूह समाजात असूनही समाजाबाहेर आहे. तो खरा स्वच्छतादूत आहे, पण त्याला सन्मान तर सोडाच समाजाची अवहेलनाच पदोपदी वाट्याला येते. भुकेसाठी चाललेला कुटुंबाचा आक्रोश थांबावा म्हणून झोपडपट्टीतील मलूल चेहरे हे किळसवाणे काम करीत असतात. जातवास्तवाचे हे ओझे घेऊन नरकयातना भोगणाऱ्या या समूहाचे वास्तव रंगमंचावर मांडणाऱ्या ‘गटार’ या एकांकिकेचा २५ वा प्रयोग मंगळवारी सादर झाला आणि ही दाहकता प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्येक प्रेक्षक स्तब्ध झाला.गटार साफ करणाऱ्यांचे अनुभव कथनातून, पुस्तकातून वाचले, ऐकले आहेत. पण हे वेदनादायी जगणे रंगमंचावर मांडणे हे खरे तर आव्हानात्मक आहे. गटार, गटारांचे मेनहोल, तेथे उतरून काम करणारे लोक, हे काम करणाऱ्यांची वस्ती आणि तेथील जीवन हे सर्व अगदी हुबेहूब नाटकाच्या फार्ममध्ये आणणे सोपे नाही. मात्र लेखक-दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांनी हे आव्हान पेलले आणि त्यांच्या बहुजन रंगभूमीने या खऱ्या स्वच्छतादूतांचे दाहक वास्तव धाडसाने रंगभूमीवर मांडले. कलावंतांचा अभिनय, नेपथ्य, प्रकाश व्यवस्था, रंगभूषा, वेशभूषा या घटकांनी ‘गटार’च्या दृश्यरूपाला सजीव करीत वास्तवाच्या अगदी जवळ नेले. विहीर किंवा गटारातील विषारी वायुमुळे दरवर्षी शेकडो लोक प्राण गमावतात. नाटकातही हे सत्य मांडण्यात आले आहे. प्रमुख पात्र असलेल्या रविच्या वडिलांसह दोघेजण गटार साफ करण्याच्या प्रयत्नात उतरतात आणि एक एक करीत मृत्यू पावतात. रवी आणि त्याची आई मदतीसाठी याचना करतात. पण रस्त्यावरून कर्णकर्कश हॉर्न देत धावणाऱ्या संवेदनहीन मोटरगाड्यांना मायलेकाचा आर्त विलाप ऐकायला जात नाही. मग रवीच परिवर्तनासाठी व्यवस्थेविरोधात विद्रोहाची मूठ आवळतो. हा मृत्यू दर्शविणारे शेवटचे दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा करते.अशा अनेक संवेदनशील दृश्य व संवादाने भरले असलेल्या गटारचा २५ वा प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सायंटिफिक सभागृहात गर्दी केली होती. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. शांतिरक्षित गावंडे, डॉ. सुनील अतकर, अर्चना ललित खोब्रागडे, सुरेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते. विविध स्पर्धांमध्ये या नाटकाला शेकडो पुरस्कार मिळाले असून प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद लाभला आहे. २५ प्रयोगानंतर नाटकातील कलावंत व इतर सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. श्रेयश अतकर, अस्मिता पाटील, अजय वासनिक, जुहील उके, सांची तेलंग, रिशील ढोबळे, करुणा नाईक, आशिष दुर्गे आदींना गौरविण्यात आले.

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी