शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘गटार’ने मांडले स्वच्छतादूतांचे दाहक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 01:31 IST

मलविसर्जन ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या विष्टेलाही साफ करणारा, प्रसंगी तो ती डोक्यावर वाहणारा एक समूह समाजात असूनही समाजाबाहेर आहे. तो खरा स्वच्छतादूत आहे, पण त्याला सन्मान तर सोडाच समाजाची अवहेलनाच पदोपदी वाट्याला येते. भुकेसाठी चाललेला कुटुंबाचा आक्रोश थांबावा म्हणून झोपडपट्टीतील मलूल चेहरे हे किळसवाणे काम करीत असतात. जातवास्तवाचे हे ओझे घेऊन नरकयातना भोगणाऱ्या या समूहाचे वास्तव रंगमंचावर मांडणाऱ्या ‘गटार’ या एकांकिकेचा २५ वा प्रयोग मंगळवारी सादर झाला आणि ही दाहकता प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्येक प्रेक्षक स्तब्ध झाला.

ठळक मुद्देएकांकिकेच्या २५ व्या प्रयोगात प्रेक्षक स्तब्ध : कलावंतांचाही सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मलविसर्जन ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या विष्टेलाही साफ करणारा, प्रसंगी तो ती डोक्यावर वाहणारा एक समूह समाजात असूनही समाजाबाहेर आहे. तो खरा स्वच्छतादूत आहे, पण त्याला सन्मान तर सोडाच समाजाची अवहेलनाच पदोपदी वाट्याला येते. भुकेसाठी चाललेला कुटुंबाचा आक्रोश थांबावा म्हणून झोपडपट्टीतील मलूल चेहरे हे किळसवाणे काम करीत असतात. जातवास्तवाचे हे ओझे घेऊन नरकयातना भोगणाऱ्या या समूहाचे वास्तव रंगमंचावर मांडणाऱ्या ‘गटार’ या एकांकिकेचा २५ वा प्रयोग मंगळवारी सादर झाला आणि ही दाहकता प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्येक प्रेक्षक स्तब्ध झाला.गटार साफ करणाऱ्यांचे अनुभव कथनातून, पुस्तकातून वाचले, ऐकले आहेत. पण हे वेदनादायी जगणे रंगमंचावर मांडणे हे खरे तर आव्हानात्मक आहे. गटार, गटारांचे मेनहोल, तेथे उतरून काम करणारे लोक, हे काम करणाऱ्यांची वस्ती आणि तेथील जीवन हे सर्व अगदी हुबेहूब नाटकाच्या फार्ममध्ये आणणे सोपे नाही. मात्र लेखक-दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांनी हे आव्हान पेलले आणि त्यांच्या बहुजन रंगभूमीने या खऱ्या स्वच्छतादूतांचे दाहक वास्तव धाडसाने रंगभूमीवर मांडले. कलावंतांचा अभिनय, नेपथ्य, प्रकाश व्यवस्था, रंगभूषा, वेशभूषा या घटकांनी ‘गटार’च्या दृश्यरूपाला सजीव करीत वास्तवाच्या अगदी जवळ नेले. विहीर किंवा गटारातील विषारी वायुमुळे दरवर्षी शेकडो लोक प्राण गमावतात. नाटकातही हे सत्य मांडण्यात आले आहे. प्रमुख पात्र असलेल्या रविच्या वडिलांसह दोघेजण गटार साफ करण्याच्या प्रयत्नात उतरतात आणि एक एक करीत मृत्यू पावतात. रवी आणि त्याची आई मदतीसाठी याचना करतात. पण रस्त्यावरून कर्णकर्कश हॉर्न देत धावणाऱ्या संवेदनहीन मोटरगाड्यांना मायलेकाचा आर्त विलाप ऐकायला जात नाही. मग रवीच परिवर्तनासाठी व्यवस्थेविरोधात विद्रोहाची मूठ आवळतो. हा मृत्यू दर्शविणारे शेवटचे दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा करते.अशा अनेक संवेदनशील दृश्य व संवादाने भरले असलेल्या गटारचा २५ वा प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सायंटिफिक सभागृहात गर्दी केली होती. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. शांतिरक्षित गावंडे, डॉ. सुनील अतकर, अर्चना ललित खोब्रागडे, सुरेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते. विविध स्पर्धांमध्ये या नाटकाला शेकडो पुरस्कार मिळाले असून प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद लाभला आहे. २५ प्रयोगानंतर नाटकातील कलावंत व इतर सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. श्रेयश अतकर, अस्मिता पाटील, अजय वासनिक, जुहील उके, सांची तेलंग, रिशील ढोबळे, करुणा नाईक, आशिष दुर्गे आदींना गौरविण्यात आले.

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी