शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आचारसंहितेत अडकला ग्रामपंचायतींचा २८ कोटींचा विकास निधी 

By गणेश हुड | Published: October 18, 2023 2:44 PM

विकास कामे लांबणीवर

नागपूर : जिल्ह्यात ३६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ७ ऑक्टोबरपर्यंत आदर्श आचारसंहिता राहणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला १५ व्या वित्त आयोगाचा २८ कोटी १९ लाखांचा निधी अडकला आहे. हा निधी  निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या तिजोरीत पोहोचू शकला नाही. परिणामी विकास कामे लांबणीवर पडली आहेत. 

ग्रामपंचायत विकासाचा केंद्रबिंदू मानत केंद्र सरकारने  वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदांना न देता थेट ग्रामपंचायतींना पाठविण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. ग्रामपंचायती समृद्ध व्हाव्यात व विकासाच्या वर्गवारीत याव्यात हा उद्देश यामागे आहे. प्राप्त झालेला निधी ग्रामपंचायतींना पाठवायचा की नाही. याबाबत जि.प.च्या पंचायत विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. 

अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीव्दारे निधी वितरित केला जातो. निकषानुसार वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेला १० टक्के, पंचायत समिती १० टक्के व ग्रामपंचायतीला ८० टक्के निधी दिला जातो. २०२३-२४ वा वर्षाच्या बंधित निधीचा पहिला हप्ता राज्य शासनाने ३ ऑक्टोबरला वितरित केला. याच दिवशी पंचायत निवडणूकांची घोषणा  झाली.  जिल्ह्यातील  ग्रामपंचायसाठी २८ कोटी २९ लाख ४६ हजार रुपयांचा निधी वितरण होईल.

जिल्ह्यात ७६३ ग्रामपंचायती आहेत. वित्त आयोगाच्या निधीचे ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप होते. जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या जवळपास २६ लाखांच्या जवळपास आहे. गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वाटप करण्यात येते.  पंचायत समितीच्या लेखाशिर्षासाठी तीन कोटी ५७ लाख ४४  हजार, तर जिल्हा परिषदेला तीन कोटी ५७ लाख ५५ हजार  असा एकूण ३५ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपयाचा निधी प्राप्त आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या  निधीला आचारसंहितेमुळे 'ब्रेक' लागला आहे. हा निधी स्वच्छता आणि हागणदारीमुक्त कार्यक्रम अपि स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल दुरुस्ती, पेयजल पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग आदी कामावर खर्च करायचा आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतfundsनिधीnagpurनागपूर