शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नागपुरात रेशन दुकानदारांनी बंद केले धान्य वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 10:13 PM

शहरातील रेशन दुकानदारांनी अचानक धान्य वितरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शनिवारी अनेक कार्डधारकांना धान्याविना परत जावे लागले. यामुळे गरीब कार्डधारकांची समस्या वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रेशन दुकानदारांनी अचानक धान्य वितरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शनिवारी अनेक कार्डधारकांना धान्याविना परत जावे लागले. यामुळे गरीब कार्डधारकांची समस्या वाढली आहे. शहरातील स्वस्त धान्य दुकानातून ७ ऑगस्टपासून या महिन्याचे धान्य वितरण करायचे होते. यासाठी प्रशासनाद्वारे ई-पॉश मशीनही सुरू करण्यात आली आहे. या बॉयोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करीत कार्ड धारकांना धान्य वितरण करण्याचे निर्देश रेशन दुकानदारांना देण्यात आले होते. याच गोष्टीमुळे दुकानदारांनी धान्य वितरण करण्यास नकार दिला. ई-पॉश मशीनवर कार्डधारकांचा अंगठा घेण्याच्या प्रक्रियेने धान्य वितरण करण्यास नागपूर रेशन दुकानदार संघाने जाहीरपणे नकार दिला. अंगठा लावण्याच्या प्रक्रियेमुळे कार्डधारक आणि दुकानदारांना कोविड १९ चे संक्रमण होण्याचा धोका संघटनेने व्यक्त केला.प्राप्त माहितीनुसार कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या कारणाने सरकारने मार्च ते ३१ जुलै २०२० पर्यंत रेशन केंद्रावर धान्य वितरणासाठी कार्डधारकांऐवजी दुकानदारांनी अंगठे लावण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून कोरोनाचा प्रसार होणार नाही. मात्र १ ऑगस्टपासून पुन्हा कार्डधारकांचे अंगठे लावणे आवश्यक करण्यात आले. यावर दुकानदारांनी आक्षेप घेतला आहे. राज्यात कोविड-१९ चा फैलाव वेगाने होत आहे. नागपूर शहरातही परिस्थिती विपरीत होत असून दररोज अनेक लोक संक्रमित होत आहेत. अशावेळी कार्डधारकांचे अंगठे ई-पॉश बॉयोमेट्रिक मशीनला लावून धान्य वितरण करणे घातक ठरू शकते, अशी भीती दुकानदारांनी व्यक्त केली. यामुळे कोविडचे संक्रमण वेगाने पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचा नियमही प्रभावित होणार असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. अंगठा लावण्याची प्रक्रिया रद्द करा, अन्यथा धान्य वितरण करणार नाही, असा इशारा दुकानदार संघटनेने दिला आहे.शहरात दोन दुकानदार संक्रमितरेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष उमाशंकर अग्रवाल यांनी सांगितले, अनेकदा ग्राहकांचा हात पकडून अंगठा लावावा लागतो. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे कठीण होते. त्यामुळे कोविडचे संक्रमण पसरण्याची शक्यता असते. सरकारने दुकानदारांना कोविडसाठी विम्याचे संरक्षण दिलेले नाही. कुठलीही सुरक्षेची सुविधाही उपलब्ध नाही. अशावेळी जीव धोक्यात घालून धान्य वितरण करावे लागते. कार्डधारकांचा अंगठा घेऊन आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. दररोज कोविड-१९ ने संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. शांतिनगर आणि डागा ले-आऊट येथील दोन दुकानदार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारने ग्राहकांचा अंगठा घेण्याऐवजी दुकानदारांचेच अंगठे लावण्याची प्रक्रिया पूर्ववत करावी, अन्यथा धान्य वितरण करणार नाही, असा इशारा अग्रवाल यांनी दिला.

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकारShoppingखरेदी