शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार नव्हे समाजाच्या सक्रियतेमुळे देश चालतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 02:41 IST

सरकारकडून विविध मुद्यांवर अपेक्षा करण्याचे प्रस्थ वाढले आहे. यातून सरकारला उठसूठ विचारणादेखील केली जाते.

मोहन भागवत : ‘सारथी’ संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळानागपूर : सरकारकडून विविध मुद्यांवर अपेक्षा करण्याचे प्रस्थ वाढले आहे. यातून सरकारला उठसूठ विचारणादेखील केली जाते. यामुळे जगातील लोकांना हा देश नेमका चालतो कसा असा प्रश्न पडतो. यातून विनोदही होतात. परंतु सर्वांनी लक्षात घ्यायला हवे की हा देश सरकार नव्हे तर समाजाची सक्रियता व गुणवत्तेवर चालतो, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केंद्रावर टीका करणाऱ्यांना चिमटा काढला आहे. नागपुरातील ‘सारथी’ या स्वयंसेवी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष समारंभाप्रसंगी रविवारी ते बोलत होते.सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पुण्यातील उद्योजक डी. एस. कुळकर्णी, ‘सारथी’चे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध वझलवार, संस्थापक सचिव अमर वझलवार, अध्यक्ष मधुकर आपटे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र राठी व ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक हे प्रामुख्याने उपस्थित होते. सत्ताधीशांच्या हाती अनेक मुद्यांचे केंद्रीकरण झाले आहे. परंतु देशाची लोकसंख्या लक्षात घेता केवळ राजकीय पक्ष, राजकारणी व नोकरशहा यांच्या भरवशावर देश चालू शकत नाही. इंग्रजांनी देश चालविला नव्हता, तर राज्य केले होते. तीच पद्धत आपण अनुसरतो आहोत. परंतु देश त्या तंत्रावर चालत नाही याचा आपल्याला विसर पडला आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे परोपकार व लोककल्याणाची भावना लोकांमध्ये जागृत होईल तेव्हा खरी प्रगती साधली जाईल. गेल्या काही काळापासून जनतेची सक्रियता वाढते आहे ही दिलासा देणारी बाब आहे, असे डॉ.भागवत म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन झाले. शिवाय राजन दंडिगे व हेमंत अंबादे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरुद्ध वझलवार यांनी केले. प्रभा देऊस्कर यांनी संचालन केले तर मधुकर आपटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)