शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

प्रवाशांसाठी गूड न्यूज... पुणे नागपूर वंदे भारत लवकरच होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:41 IST

रेल्वेमंत्र्यांकडून संकेत : प्रवाशांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वर्षातील बाराही महिने प्रचंड गर्दी असल्याने मिळेल ते तिकीट घेऊन नागपूर-पुणे- नागपूर असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मूड़ न्यूज आहे. लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ही जलद गती ट्रेन सुरू केली जाणार आहे. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीच तसे संकेत दिले आहेत.

हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर-जोधपूर एक्स्प्रेस व एमजीआर चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी एक्स्प्रेस गाड्यांचे उ‌द्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन दिवसांपूर्वी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की, पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.

वैष्णव यांचे हे वक्तव्य नागपूर-पुणे-नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठे दिलासादायक आहे. कारण नागपूर-पुणे-नागपूर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रोजची संख्या हजारोंच्या घरात आहे. १४ ते १६ तासांचा हा प्रवास करण्यासाठी बहुतांश प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळे या मार्गावर वर्षातील ३६५ ही दिवस मोठी गर्दी असते. परिणामी अनेकांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळतच नाही. जे मिळाले ते तिकीट घेऊन प्रवासी रेल्वेत चढतात. अनेक जण खासगी बसचा पर्याय निवहतात. मात्र, बसने एवळा लांबचा प्रवास करताना प्रवाशांची कंबरमोड होते. प्रवास भाडेही जास्त जाते आणि अनेक कारणांमुळे बसचा प्रवास कंटाळवाणा ठरतो. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यात यावी, अशी सुमारे दोन वर्षापासूनची प्रवाशांची मागणी होती. त्या संबंधाने प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून तसे निवेदनही रेल्वे मंत्रालय, रेल्वे प्रशासनाकडे गेले होते. मात्र, वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा अधिकार सर्वस्वी रेल्वे मंत्रालयाचा असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांकडून हतबलता व्यक्त होत होती. आम्हालाही ही गाडी सुरू व्हावी, असे मनोमन वाटत असल्याची प्रतिक्रिया अधिकारी खासगीत व्यक्त करीत होते. या पार्श्वभूमीवर, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची चर्चा झाल्याचे आणि सर्व काही सकारात्मक असल्याचे पुढे आल्याने नागपूर-पुणे-नागपूर वंदे भारत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहे.

नागपूरहून धावणारी चौथी वंदे भारतसर्व प्रथम अडीच वर्षांपूर्वी नागपूर-जबलपूर-नागपूर ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर दूसरी वंदे भारत नागपूर उज्जैन इंदोर ही सुरू झाली. नंतर ध्यानीमनी नसताना गेल्यावर्षी नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. आता नागपूर-पुणे-नागपूर सुरू झाल्यास नागपूरहून धावणारी ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस ठरणार आहे. ती लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

मोठा प्रतिसाद मिळणारगेल्यावर्षी सुरू करण्यात आलेली नागपूर-सिकंदराबाद ही २२ कोचची वंदे भारत एक्स्प्रेस अनेक महिने रिकामी ठणठण धावत होती. त्यामुळे रेल्वेला चांगलाच आर्थिक फटका बसला. तोटा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या गाडीचे आठ कोच कमी केले. तरीसुद्धा तिला प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद नाही. याउलट नागपूर-पुणे-नागपूर तंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास ही गाडी वर्षभर प्रवाशांनी भरभरून धावणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांना तर फायदा होईलच मात्र, रेल्वे प्रशासनालाही उत्पन्नाच्या रूपाने मोठा फायदा मिळणार आहे. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसnagpurनागपूरAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव