शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

योग्य सिंचन व मशागतीमुळे संत्र्याचे दोन लाखांचे उत्पन्न; नागपूर जिल्ह्यातील खरसोलीच्या अरसडे यांनी साकारली २८०० झाडांची फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 20:44 IST

खरसोली येथील सेवानिवृत्त प्राध्यापक धनराज अरसडे यांनी सांगितले. संत्राबागेतून वर्षाला सरासरी दोन लाखांचे उत्पन्न मिळते. योग्य सिंचन व मशागत केल्यास संत्रा पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले.

ठळक मुद्देयोग्य सिंचन व मशागत केल्यास संत्रा पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय

श्याम नाडेकर।आॅनलाईन लोकमतनागपूर : शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे शेतीची मुळातच आवड. कोरडवाहू शेती न परवडणारी, त्यामुळे सिंचनाची सोय निर्माण करून संत्रा उत्पादनाकडे वळलो. पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या पद्धतीनेच वडील ओलित करायचे, त्यामुळे पाण्याची कमतरता जाणवायला लागली. उत्पादनात घट झाली. या सर्व बाबींचा विचार करून सर्वप्रथम ठिबक सिंचन वापरून सिंचनाचे योग्य नियोजन केले. त्यातून आज २० एकर जमिनीत जवळपास २,८०० संत्राझाडांची फळबाग फुलविल्याचे खरसोली येथील सेवानिवृत्त प्राध्यापक धनराज अरसडे यांनी सांगितले. संत्राबागेतून वर्षाला सरासरी दोन लाखांचे उत्पन्न मिळते. योग्य सिंचन व मशागत केल्यास संत्रा पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले.शेतीत काम करणाऱ्या मजुरांची आज सर्वत्र वानवा आहे. त्यामुळे इतर पिकांची मशागत करताना मजुरीवर खर्च अधिक होतो. त्यामुळेच इतर पिके परवडेनाशी झाली आहे. संत्राबागेकरिता तुलनेने कमी मजूर लागतात. ठिबक सिंचनाद्वारेच झाडांना शेणखत व इतर खतांचा पुरवठा केला जातो. शेती तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घेऊन मशागत केली जाते. संत्र्याकरिता सर्वात महत्त्वाचे म्हणजे फवारणी, आंतरमशागत व सिंचनाची वेळ आहे. त्याचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात योग्य नियोजन केल्यास संत्रापिकाला आपल्या भागात तोड नाही, असे धनराज अरसडे सांगतात.पावसाळा उशिरा सुरू होत असल्याने मृगबहाराच्या संत्र्याचा आकार लहान राहतो, शिवाय फळांची उशिरा तोडणी केल्याने संत्राझाडे वाळण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नियोजन करून आंबियाबहाराचे पीक घेतो. याला बाजारात मागणीही मोठ्या प्रमाणात असते व भावही चांगला मिळतो. नागपूर जिल्ह्यात नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर व कळमना नागपूर येथे बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने सोयीचे असल्याचे त्यांनी सांगितले.संत्रा कलमांमध्ये शेतकऱ्यांची फसगतसद्यस्थितीत बाहेरून येणाऱ्या संत्र्याच्या कलमांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसगत होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत: तयार केलेल्या कलमांची २० एकरात लागवड केली आहे. संत्रा झाडांचे आयुष्य सरासरी २५ वर्षे आहे. सुरुवातीची पाच वर्षे योग्य नियोजन केल्यास पुढील २० वर्षे उत्पन्न सुरू होते. दरवर्षी सरासरी दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळते. कमी मशागत, जास्त उत्पन्न देणारे संत्रा पीक आहे, फक्त योग्य नियोजन व मशागत गरजेचे असल्याचे अरसडे म्हणाले.

 तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावेल!संत्रा आकाराने लहान असल्यास भाव कमी मिळतो. अशा लहान संत्र्यांचा उपयोग संत्रा कारखान्यात होतो. नागपूर जिल्ह्यात विशेषत: नरखेड, काटोल परिसरात अशा प्रकारचे कारखाने सुरू झाले तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी संत्रा उत्पादनाकडे वळून त्यांची आर्थिक स्थिती नक्कीच उंचावेल, असा विश्वास धनराज अरसडे यांनी व्यक्त केला. शासनाने केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. त्याचा संत्रा उत्पादकांना फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती