शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कागदी लगद्यांपासून बनताहेत गणेशमूर्ती : हरित लवादाच्या निर्णयाची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 11:21 IST

‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी अनेक जण कागदी लगद्यापासून तयार झालेल्या गणेशमूर्तींना प्राधान्य देतात. परंतु प्रत्यक्षात अशा मूर्ती या जलसाठ्यांसाठी प्रचंड धोकादायक असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते.

ठळक मुद्देजलप्रदूषणाचा धोका राज्य शासन कधी घेणार पुढाकार ?

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी अनेक जण कागदी लगद्यापासून तयार झालेल्या गणेशमूर्तींना प्राधान्य देतात. अगदी राज्य शासनानेदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते. परंतु प्रत्यक्षात अशा मूर्ती या जलसाठ्यांसाठी प्रचंड धोकादायक असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. आश्चर्याची बाब म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाने यासंदर्भात निर्णय दिला असतानादेखील मागील दोन वर्षांपासून याची अंमलबजावणी झालेली नाही. पर्यावरणासाठी विविध उपक्रम हाती घेतलेल्या राज्य शासनाकडून यासंदर्भात कधी पुढाकार घेण्यात येईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याची ओरड झाल्याने राज्य शासनाने ३ मे २०११ रोजी पर्यावरण विभागाच्या माध्यमातून सणांच्या पर्यावरणपूरक साजरीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे जारी केल्या होत्या. कागदी लगद्यांपासून बनलेल्या मूर्तींना प्रोत्साहन द्यावे, अशी भूमिका शासनाने घेतली होती. २०१० साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्तीसोबत कागद असतील तर पाण्यात विसर्जन करू नये अशा मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने या सर्वांचा कसलाही अभ्यास न करता शासन निर्णय जारी केला होता. प्रत्यक्षात कागदी लगदा हादेखील धोकादायक असल्याची बाब संशोधनातून समोर आली.हिंदू जनजागृती समितीचे शिवाजी वटकर यांनी २०१५ मध्ये राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचा अहवाल तसेच सांगली येथील पर्यावरणतज्ज्ञ डॉ.सुब्बाराव यांच्या संस्थेने केलेल्या संशोधनाचा अहवाल सादर करण्यात आला होता.कागदामध्ये असलेल्या रसायनांमुळे प्राणवायूचे प्रमाण शून्यावर आल्याचे निदर्शनास आले होते. तसेच कागदाचा लगदा पाण्यात गेल्यावर त्याचे बारीक कण होतात व त्याचा फटका जलचरांना बसतो, असेदेखील एका अभ्यासातून समोर आले होते. राष्ट्रीय हरित लवादाने कागदी लगद्याचा वापर मूर्तींमध्ये करण्यात येऊ नये, असा निर्णय दिला होता व या मूर्तींचा प्रचार-प्रसार न करण्याचे निर्देश शासनाला दिले होते. ३० सप्टेंबर २०१६ रोजी हा निर्णय देण्यात आला होता. मात्र त्यानंतर दोन वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील राज्य शासनाने यासंदर्भात पुढाकार घेतलेला नाही. याबाबत कुठलीही सूचना संबंधित विभागांनादेखील देण्यात आलेली नाही.

१० किलोच्या मूर्तीमुळे हजार लिटर पाणी प्रदूषितमुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेने कागदी लगद्याच्या मूर्तींचा पाण्यावर काय परिणाम होतो यावर संशोधन केले होते. या संशोधनानुसार १० किलोच्या कागदी मूर्तीमुळे सुमारे १००० लिटर पाणी प्रदूषित होते. कागदामुळे पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅडमिअम, टायटॅनिअम आॅक्साईड इत्यादी विषारी धातू मिसळले जातात, असेदेखील या संशोधनातून समोर आले होते. हा अहवाल राष्ट्रीय हरित लवादासमोर सादर करण्यात आला होता.

शासनाने तत्परता दाखवावीराज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलबंदीसंदर्भात तत्परता दाखविली होती. गणेशोत्सवाच्या काळात जलप्रदूषणाचा धोका वाढतो. अनेक संकेतस्थळाच्या माध्यमातूनदेखील कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तींची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे कागदी लगद्यांचा वापर थांबावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव