शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये मृतांवर व्हावेत रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार; अनेक जण राहतात एकटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 10:53 IST

कुटुंबीय व नातेवाईक जवळ नसलेल्या व्यक्तीचा लॉकडाऊनदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्यावर रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करावेत. याकरिता प्रशासनाने व्यवस्था उभी करावी, अशी भावना बंगळुरू येथील डॉ. दीपशिखा चक्रवर्ती यांनी शुक्रवारी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

ठळक मुद्देआईला गमावलेल्या बंगळुरूतील मुलीची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुटुंबीय व नातेवाईक जवळ नसलेल्या व्यक्तीचा लॉकडाऊनदरम्यान मृत्यू झाल्यास प्रशासनाने त्याच्यावर रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करावेत. याकरिता प्रशासनाने व्यवस्था उभी करावी, अशी भावना बंगळुरू येथील डॉ. दीपशिखा चक्रवर्ती यांनी शुक्रवारी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.दीपशिखा यांच्या वयोवृद्ध आई बाणी चक्रवर्ती या वाडी येथे एकट्या राहत होत्या. त्या ७३ वर्षांच्या होत्या. २ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाऊन लागू असल्यामुळे दीपशिखा व त्यांचे मुंबई येथे राहत असलेले भाऊ अनेक प्रयत्न करूनही वाडी येथे पोहचू शकले नाहीत. त्यामुळे दीपशिखा यांनी नागपूर येथे उच्च पदावर कार्यरत मैत्रिणीला फोन लावून आईवर शक्य त्या पद्धतीने अंत्यसंस्कार करून घेतले. अशी वेळ कुणावरही येऊ शकते आणि जाग्यावरून सर्व व्यवस्था करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे प्रशासनाने अशा घटना घडल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे, असे मत दीपशिखा यांनी व्यक्त केले.दीपशिखा यांचे वडील आयुधनिर्माणी अंबाझरी येथे अधिकारी होते. दरम्यान, त्यांनी वाडी येथे घर बांधले. त्यांच्या मृत्यूनंतर दीपशिखा व त्यांच्या भावाने आईला सोबत नेले. परंतु, आईचा वाडी येथेच राहण्याचा आग्रह होता. त्यामुळे त्या वाडी येथील घरी एकट्या राहत होत्या. त्यांच्या सेवेसाठी एक केअरटेकर व दोन नर्सेस ठेवल्या होत्या. दरम्यान, २ एप्रिल रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांच्यासारखे अनेक जण मुले व नातेवाईकांपासून दूर विविध ठिकाणी एकटे राहतात. लॉकडाऊनदरम्यान, अशी घटना घडल्यास कुटुंबीय व नातेवाईकांना वेळेवर संबंधित ठिकाणी पोहचणे अशक्य होऊ शकते. कोरोनामुळे शेजारीही पुढे येण्यास घाबरू शकतात. अशावेळी अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीत प्रशासनाने सज्ज राहणे आवश्यक आहे. मृतदेहाची विटंबना होणार नाही याची काळजी घेऊन आणि रीतिरिवाज पाळून अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण केली गेली पाहिजे, असे दीपशिखा यांनी सांगितले.

 

टॅग्स :Deathमृत्यू