शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

माल वाहतूक बंद : नागपुरात  किराणा दुकानात आवश्यक वस्तूंचा साठा संपण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:36 AM

पूर्वी राज्य शासन आणि नंतर केंद्र शासनाच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर किराणा दुकांनामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साखर, खाद्यतेल, धान्य, कणीक, आटा, मैदा या वस्तूंना जास्त मागणी असल्याने बहुतांश किराणा दुकानातील साठा संपण्याची भीती आहे.

ठळक मुद्देहोलसेलमधून साखर, खाद्यतेल, आटा यांची आवक घटली

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पूर्वी राज्य शासन आणि नंतर केंद्र शासनाच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर किराणा दुकांनामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साखर, खाद्यतेल, धान्य, कणीक, आटा, मैदा या वस्तूंना जास्त मागणी असल्याने बहुतांश किराणा दुकानातील साठा संपण्याची भीती आहे. माल वाहतूक बंद असल्याने जिल्हा वा राज्याबाहेरून तसेच होलसेल मार्केटमधून या वस्तूंची आवक बंद असल्याने पुढे या वस्तूंची विक्री करणे शक्य होणार नाही. याकरिता शासनाने मदत करून आवश्यक वस्तूंची माल वाहतूक खुली करण्याची मागणी किराणा दुकानदारांनी केली आहे.नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, लॉकडाऊन आणि कलम १४४ चे पालन करीत नागपुरातील सर्वच किराणा दुकानदारांनी वाजवी किमतीत जीवनाश्यक वस्तूंची विक्री केली आणि साठा असेपर्यंत करणार आहेत. बैठकांमध्ये जिल्हाधिकारी किराणा दुकाने उघडी ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. साठा असेपर्यंत वस्तूंची विक्री करूच, अन्यथा दुकाने बंद करावी लागतील. लोकांकडून अनावश्यक मागणी वाढली आहे. अनेकांनी दोन-दोन महिन्याच्या किराणा मालाची खरेदी केली आहे. त्यामुळे गरजूंना विक्रीसाठी साठा कमी पडत आहेत. देशात जीवनावश्यक वस्तूंचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, पण बहुतांश ठिकाणी माल वाहतूक थांबल्याने किरकोळ किराणा दुकानात वस्तू पोहोचत नाहीत. याकरिता शासनाने असोसिएशनला मदत करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.असोसिएशनचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, किराणा दुकानांमध्ये सर्व वस्तूंचा साठा उपलब्ध करून देण्याचे व्यापाऱ्यांचे प्रयत्न आहेत. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडू देणार नाही, याची हमी दुकानदार देत आहेत. होलसेलमधून माल मागविण्यात येत आहे. पण त्यांच्याकडे उपलब्ध असलेला माल आम्हाला पाठवत आहेत. माल वाहतूक बंद असल्याने वस्तू शहरात आलेल्या नाहीत. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची माल वाहतूक सुरू ठेवावी.इतवारी तेल असोसिएशनचे अध्यक्ष राजूभाई ठक्कर म्हणाले, गुजरात आणि अन्य राज्यांतून शेंगदाणा आणि सोयाबीन कच्च्या तेलाची आवक बंद असल्याने खाद्यतेलाचा पॅकिंग कारखाना बंद केला आहे. आमचे स्वाद ब्रॅण्ड तेल साठा असेपर्यंत विकले. पण आता पॅकिंग बंद असल्याने तेलाची विक्री शक्य नाही. शासनाने पासेसची व्यवस्था करून आवश्यक माल वाहतूक खुली करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीत केली आहे. याकरिता जिल्हाधिकारीही सकारात्मक आहेत. कच्चा माल पोहोचल्यास पॅकिंग करून खाद्यतेल बाजारात उपलब्ध करून देऊ. कमतरता भासू देणार नाही.गिन्नी अ‍ॅग्रोचे संचालक गोविंद मंत्री म्हणाले, कणीक, आटा, मैदा गिन्नी ब्रॅण्ड नावाखाली बाजारात उपलब्ध करून देण्यात येत आहे. कुठलीही कमतरता पडू देणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. युनिटमध्ये अर्धेच कर्मचारी असल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. पावसामुळे गहू ओला झाला आहे. त्यामुळे खरेदी थांबली आहे. पण उपलब्ध कच्च्या मालापासून फिनिश माल तयार करण्यात येत आहे. लोकांची मागणी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर