शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

विदर्भातही पूरस्थिती; गडचिरोलीत दोघे बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 2:41 AM

भंडारा, गोंदियात रेड अलर्ट

नागपूर : संततधार पावसामुळे विदर्भातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन जण पुरात वाहून गेले. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने गावांमध्ये पाणी शिरले. संसतधार पावसामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागड, अहेरी, सिरोंचा तालुक्यात नदी-नाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसात दोघे पुरात वाहून गेले. भामरागडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने ३०० कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले.भंडारा व गोंदिया जिल्ह्यांशिवाय शेजारील सीमावर्ती मध्य प्रदेशातही दमदार पाऊस असल्याने पुजारीटोलासह गोंदिया जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. परिणामी एकट्या भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठावरील ८२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अमरावतीमधील धारणी तालुक्यात २४ तासात तब्बल १२५.१ मिमी पाऊस बरसला. नद्यांना पूर आला असून सुमारे ४० गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टरील पिके पाण्याखाली आली आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली-कोंढाणा लगतच्या पुलावरून पाणी वाहत असताना काल बुधवारी सायंकाळच्या वेळी घरी परतणारी १५ जनावरे वाहून गेली. यवतमाळ जिल्ह्यांतही जोरदार पाऊस आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भRainपाऊस