शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

प्रेमात पडली, घरदार सोडले, जिवाची मुंबई करायला जाताना नागपूरमध्ये पकडले

By नरेश डोंगरे | Updated: July 3, 2025 19:21 IST

नवऱ्याला ठेंगा, दोन मुलांकडेही पाठ : आंध्र प्रदेशातील जोडप्यांना नाट्यमयरित्या अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १० वर्षांचा संसार अन् सोन्यासारख्या दोन मुलांकडे पाठ फिरवून आंध्र प्रदेशातील एका महिलेने प्रियकराचा हात धरला. जिवाची मुंबई करण्यासाठी हे दोघे आंध्र प्रदेशातून मायानगरीकडे निघाले. मात्र, नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांना ट्रेस करून रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) त्यांचे पलायन नाट्य उधळले.

विवाह्यबाह्य संबंधातून पुढे आलेल्या या घटनेतील चमेली (वय ३२, नाव काल्पनिक) आंध्र प्रदेशातील काकीनाडा जवळची रहिवासी आहे. तिच्या लग्नाला १० वर्षे झाली असून तिला दोन मुले आहेत. ती शिक्षिका होती. मात्र, चांगला जॉब करणाऱ्या नवऱ्याने घरी पुरेसा वेळ देत नसल्यामुळे तिला जॉब सोडण्यास सांगितले. त्यानंतर घरातल्या घरात राहावे लागते. मनासारखे मोकळेपणाने बाहेर फिरता येत नसल्याने ती घुसमट होत असल्याचे सांगायची. यावरून पती-पत्नीमध्ये वाद व्हायचे. दरम्यान, याच गावात राहणाऱ्या ४२ वर्षीय चमनलाल (नाव काल्पनिक) सोबत तिचे सूत जुळले. तो खासगी जॉब करतो. 'छूप-छुपके' भेटावे लागते, मनासारखा वेळ एकमेकांना देता येत नसल्याची दोघांची भावना झाल्याने त्यांनी आंध्र सोडून मायानगरी मुंबईत पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ट्रेन नंबर १८०३० एलटीटी मुंबई एक्स्प्रेसची तिकिटे काढून १ जुलैला या दोघांनी गावातून पळ काढला. ते लक्षात येताच कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. रेल्वे पोलिसांनी गाडीचा रूट लक्षात घेत नागपूर आरपीएफला दोघांची सचित्र माहिती देऊन त्यांना ताब्यात घेण्याची विनंती केली. त्यानुसार, नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येताच आरपीएफचे निरीक्षक अश्विनी कुमार, सत्येंद्र यादव, उपनिरीक्षक प्रियंका सिंग, ईश्वर राव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 'ऑपरेशन रेल प्रहरी' राबवून ट्रेनच्या कोच नंबर ए-२ मधून या महिलेसोबत तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. 

नवऱ्याशी पटत नाही म्हणून...विवाहबाह्य प्रेमसंबंधातून घरून पळून जात असल्याची कबुली या दोघांनी प्राथमिक चाैकशीत दिली. नवऱ्याशी पटत नाही म्हणून घर सोडल्याचे चमेलीने सांगितले. पोलिसांनी दोन मुलांच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित करून तिचे समुपदेशन केले.

अखेर घरवापसी !हे दोघे गवसल्याचे आणि ते आपल्या ताब्यात असल्याची माहिती नागपूर आरपीएफने आंध्र प्रदेश पोलिसांना कळविली. त्यानुसार, काकीनाडा पोलिस या दोघांच्या कुटुंबीयांसह नागपुरात पोहचले. कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून या दोघांना बुधवारी त्यांच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे बुधवारी या दोघांची घरवापसी झाली. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी