शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नृत्य आणि संगीतातून केली ऋतुसंहाराची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 01:25 IST

कालिदासांनी रचलेल्या ऋतुसंहार या महाकाव्यात सहा ऋतूंच्या सहा सोहळ्याचे वर्णन केले आहे. सहा ऋ तूंच्या याच सहा सोहळे नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून सोमलवार हायस्कूल निकालस शाखेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक अनुभूती करून दिली आहे. ‘रसरंग’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुलाबी थंडीत ऋतुसंहारातील निसर्गाच्या विविध छटांचे मनमोहक दर्शन या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे घडविले.

ठळक मुद्देसोमलवार हायस्कूल निकालस शाखेच्या विद्यार्थ्यांनी उधळला निसर्गाचा ‘रसरंग’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कालिदासांनी रचलेल्या ऋतुसंहार या महाकाव्यात सहा ऋतूंच्या सहा सोहळ्याचे वर्णन केले आहे. सहा ऋ तूंच्या याच सहा सोहळे नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून सोमलवार हायस्कूल निकालस शाखेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक अनुभूती करून दिली आहे. ‘रसरंग’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुलाबी थंडीत ऋतुसंहारातील निसर्गाच्या विविध छटांचे मनमोहक दर्शन या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे घडविले.या कार्यक्रमाला कलाशिक्षक डॉ. श्रीराम बाभुळकर, विकास जोशी, प्रसिद्ध नृत्यांगणा रत्नम जनार्दन नायर, अवनी काटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सोमलवार शिक्षण संस्थेचे अ‍ॅड. मधुकर सोमलवार, प्राचार्य विवेक जोशी, पर्यवेक्षक दामोदर ठोंबरे यांचीही उपस्थिती होती. या विद्यार्थ्यांनी कालिदासाने रचलेले ऋतुसंहार हे काव्य चित्र, नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मांडले. शाळेच्या पटांगणात ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत ऋतूत सृष्टीत प्रकट होणारे रंग, निसर्गाचे सौंदर्य, सण सोहळे क्राफ्ट आणि चित्रकलेच्या माध्यमातून साकारले. त्याचबरोबर रसरंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक ऋतूची नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून अनुभूती करून दिली. गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कालिदासाचे महत्त्व विशद करण्यात आले. त्यानंतर ग्रीष्म ऋतूचे आगमन मंचावर झाले. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे होरपळून गेलेल्या सृष्टीत प्राणी पक्ष्यांची झालेली जीवाची काहिली, तहानलेल्या जीवांची कासाविस विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या नृत्यातून सादर केली. ग्रीष्मात येणाऱ्या वटसावित्रीच्या सणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश यावेळी दिला. त्यानंतर वर्षा ऋतूचे आगमन झाले. संपूर्ण पृथ्वीवर चहुकडे हिरवळ दाटली, पक्षीप्राण्यांची चिवचिवाट सभोवताली दाटली, मेघ गरजले, वायुसंगे वृक्षांचे नर्तन सुरू झाले. हा सर्व आनंददायी निसर्गाचा सोहळा विद्यार्थ्यांनी ‘वर्षा ऋतुची राज सवारी रसिक मना आवडे...’ या गीतावर विलोभनीय नृत्य सादर करून उपस्थित रसिकांना त्याची अनुभूती करून दिली. अशाच पद्धतीने इतरही ऋतूंचे संगीत आणि नृत्यातून विद्यार्थ्यांनी वर्णन केले. निसर्गाचा एक आगळावेगळा ऋतुसंहार या कार्यक्रमात उपस्थित रसिकजनांनी मनमुराद अनुभवला.

टॅग्स :Schoolशाळाdanceनृत्य