शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तिघांचा बळी जाऊनही ‘गाेवरी’चा पूल तयार हाेईना; विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे राेज हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:48 IST

दाेन वर्षांपासून बांधकाम अर्धवट

आशिष साैदागर

कळमेश्वर (नागपूर) : शहरालगतच्या गाेवरी नदीवरील पुलाच्या बांधकामाला दाेन वर्षांपूर्वीच सुरुवात करण्यात आली. या काळात येथे झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर पुलाअभावी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे राेज हाल हाेत असून, हा प्रकार प्रशासनाला माहिती आहे. मात्र, पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याने या पुलाचे बांधकाम नेमके कधी पूर्ण हाेणार, असा प्रश्न या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गाेवरी नदीच्या पलीकडे कळमेश्वर शहरातील अनेकांची शेती असून, या मार्गावरील खैरी, गोवरी, तिष्टी, पारडी, तोंडाखैरी, बेल्लोरी, सिल्लोरी यासह अन्य गावांमधील शेकडाे विद्यार्थी व शेतकरी याच पुलावरून कळमेश्वर शहरात आठवडी बाजारासह अन्य शासकीय व वैद्यकीय कामांसाठी राेज येतात आणि कळमेश्वर शहरातील शेतकरी त्यांच्या शेतीची वहिवाट करतात. त्यामुळे या राेडसह पुलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या नदीवर पाच सिमेंटचे माेठे पाइप टाकून रपटावजा कमी उंचीचा व अरुंद पूल फार पूर्वी तयार करण्यात आला. दरवर्षी पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने तसेच इतर गावांचा शहराशी संपर्क तुटत असल्याने या ठिकाणी नव्याने उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी पुढे आली. त्याअनुषंगाने राज्य सरकारने पुलाच्या बांधकामाला प्रशासकीय मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिला. पुलाचे काम वर्षभरात पूर्ण हाेणे अपेक्षित असताना दाेन वर्षे पूर्ण हाेऊनही ते पायव्याच्या पुढे सरकले नाही. मागील काही महिन्यांपासून कंत्राटदाराने बांधकाम बंद केले आहे. त्याचे कारणही कुणी सांगायला तयार नाही.

या पुलाचे बांधकाम स्ट्रक्चर प्रोजेक्ट आर्च न बनवता सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कंत्राटदार कंपनीला अद्याप पुलाचा स्ट्रक्चर आर्च न मिळाल्याने काम बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या पुलाच्या अंदाजे ३० टक्के कामावर ८० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. बांधकाम कालावधी वाढणार असल्याचे खर्चही वाढणार आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

सात गावांचा संपर्क तुटताे

हा पूल कळमेश्वर तालुक्यातील खैरी, गोवरी, तिष्टी, पारडी, तोंडाखैरी, बेल्लोरी व सिल्लोरी महत्त्वाच्या गावांना कळमेश्वर शहराशी जाेडताे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे या गावांचा शहराशी संपर्क तुटताे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना पूर ओसरेपर्यत तासनतास प्रतीक्षा करीत नदीच्या काठावर उभे राहावे लागते. शिवाय, पुलावरून पुरात वाहून जाण्याचीही भीती असते. हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.

२.९५ काेटी रुपयांचा निधी मंजूर

गाेवरी नदीवरील पुलाच्या बांधकामाला राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी प्रदान करीत जानेवारी २०२१ मध्ये त्यासाठी दाेन काेटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या कामाचे नागपूर शहरातील कंत्राट श्री साई बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. कंपनीला या पुलाचे बांधकाम १२ महिन्यात म्हणजे जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचे हाेते. मात्र, या ठिकाणी पायव्याव्यतिरिक्त काेणतेही काम आजवर करण्यात आले नाही.

बांधकाममध्येच बंद केल्याने कंत्राटदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनस्तरावर स्ट्रक्चर आर्चबाबत कार्यवाही केली जात आहे. यात शासनाचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतल्या जात आहे. नव्याने निविदा काढून उर्वरित बांधकाम प्रक्रिया रेग्युलर कन्व्हर्ट करून ते लवकरच पूर्ण केले जाईल.

- रुपेश बोधडे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कळमेश्वर

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकSocialसामाजिकnagpurनागपूर