शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘सेंट्रल’ प्रणालीमुळे शिक्षणाचे नुकसान

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

ज्येष्ठ अणु वैज्ञानिक व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण व विज्ञान क्षेत्रासंबंधातील निरनिराळ्या बाबींवर आपले मत व्यक्त केले.

अनिल काकोडकर : तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांवर उपाययोजनांची गरजनागपूर : ज्येष्ठ अणु वैज्ञानिक व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण व विज्ञान क्षेत्रासंबंधातील निरनिराळ्या बाबींवर आपले मत व्यक्त केले. रायसोनी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘सेंट्रल’ प्रणालीपेक्षा समकक्ष समूहांच्या निर्मितीवर भर देण्यात यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षण संस्था असतानादेखील महाविद्यालयांमधील शैक्षणिक दर्जा का वाढताना दिसत नाही, यासंदर्भात त्यांना विचारणा करण्यात आली. जास्त प्रमाणात महाविद्यालये असताना ‘सेंट्रल’ प्रणालीद्वारे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या दर्जावर परिणाम होतो व विद्यार्थ्यांना हवे तसे शिक्षण मिळत नाही. केवळ पदवी घेऊन उपयोग नाही तर विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्घेच्या युगात यश मिळविण्यासाठी तयार करायला हवे. त्यामुळेच ‘सेंट्रल’ प्रणालीऐवजी समकक्ष समूहांची स्थापना झाली पाहिजे. सुरुवातीला यात अनेक अडचणी येतील. परंतु कालांतराने सर्व सुरळीत होऊन शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल. या प्रक्रियेला वेळ दिला पाहिजे, असे काकोडकर यांनी सांगितले. दिवसेंदिवस तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून, सर्वांच्याच राहणीमानावर त्याचा फरक पडतो आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या फायद्यासोबतच दुष्परिणामांवर विचार करणे व उपाययोजना राबविण्याची गरज आहे, असे डॉ. काकोडकर म्हणाले. (प्रतिनिधी) विज्ञानातून दूर होऊ शकते पाणीटंचाईदरवर्षी राज्यातील असंख्य गावांत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई आढळून येते. यंदादेखील पाऊस सरासरीहून कमी आल्यामुळे चिंता वाढली आहे. परंतु पाणीटंचाईवर विज्ञानातून मार्ग शोधल्या जाऊ शकतो. ‘आयसोटोप हायड्रोलॉजी’च्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात ‘ग्राऊंडवॉटर’ची योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. अशाच प्रकारच्या उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे मत डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ‘बीएआरसी’ व निरनिराळ्या कृषी महाविद्यालयांच्या संशोधनातून निरनिराळ्याडाळी, तेलबिया यांच्या सुधारित जाती विकसित करण्यात यश आले आहे. विज्ञानाच्या शक्तीचे हे चांगले उदाहरण आहे, असेदेखील ते म्हणाले. अणुऊर्जेच्या बाबतीत देश सातत्याने प्रगती करीत असून, येणारा काळ हा भारताचाच असेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.