शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

घरातील धूळ ठरतेय दम्याला कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:12 IST

नागपूर : वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. आजाराला अनेक धोकादायक ...

नागपूर : वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. आजाराला अनेक धोकादायक घटक कारणीभूत असले तरी एका निरीक्षणात घरातील धूळ हेसुद्धा कारण ठरले आहे. या धुळीमुळे ५० ते ६० टक्के रुग्णांना दमा झाल्याचे समोर आले आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळेही या आजाराचे रुग्ण वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ज्या लोकांना अस्थमा (दमा) असतो, त्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवदेनशील, प्रभावित होणारी आणि नाजूक असते. यामुळे धूळ, धुराच्या संपर्कात येताच ती आंकुचन पावून श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येते. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही, यालाच अस्थमा (दमा) म्हणतात. ढगाळ वातावरणामुळे अस्थमाच्या रुग्णांना जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. यामुळे वेळीच काळजी घेण्याचा सल्ला श्वसनरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

-बालकांमध्ये अस्थमा

शहरातील वाढती बांधकामे, घरातील ओल लागलेल्या भिंती, व्हेंटिलेशनचा अभाव, हवेतील प्रदूषण, वातावरणातील बदल व बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात फुफ्फुसाचे आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी ५ ते ११ वयोगटातील बालकांमध्ये दम्याचे विकार वाढत आहे. भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा असल्याचे आढळून आले आहे.

-अशी घ्यावी काळजी

दमा आजार असलेल्यांनी औषधी वेळेवर घ्यावे. बेकरीचे पदार्थ, थंड पाणी, रासायनिक पदार्थ असलेले हबाबंद पदार्थ टाळावे. फळे व घरचा ताजा आहार घ्यावा. याशिवाय गार हवेत झोपणे, थंड वारा अंगावर घेणे, गोड खाल्ल्यानंतर पाणी घेणे, दुपारी जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. धूळ व प्रदूषणापासून दूर रहावे.

-कोट... (फोटो घ्यावा)

दम्याचे अचूक निदान शक्य आहे आणि त्यावर नियंत्रण मिळविणेही शक्य आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे व धुळीमुळे दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. यामुळे घरामध्ये धूळ साठेल असे कारपेट्स ठेवू नका. घर सफाईच्यावेळी धूळ उडणार नाही, अशा पद्धतीने साफसफाई करा. घरात धूर करण्यापूर्वी म्हणजे, उदबत्ती, कासव छाप अगरबत्ती जाळण्यापूर्वी विचार करा. फुफ्फुस क्षमता चाचणीने निदान पक्के करा. डॉक्टरांनी दिलेले औषधी नियमित घ्या. ज्या पदार्थांची अॅलर्जी आहे ते पदार्थ टाळा.

-डॉ. सुहास कानफाडे, छातीरोगतज्ज्ञ