शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

घरातील धूळ ठरतेय दम्याला कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:12 IST

नागपूर : वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. आजाराला अनेक धोकादायक ...

नागपूर : वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. आजाराला अनेक धोकादायक घटक कारणीभूत असले तरी एका निरीक्षणात घरातील धूळ हेसुद्धा कारण ठरले आहे. या धुळीमुळे ५० ते ६० टक्के रुग्णांना दमा झाल्याचे समोर आले आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळेही या आजाराचे रुग्ण वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ज्या लोकांना अस्थमा (दमा) असतो, त्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवदेनशील, प्रभावित होणारी आणि नाजूक असते. यामुळे धूळ, धुराच्या संपर्कात येताच ती आंकुचन पावून श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येते. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही, यालाच अस्थमा (दमा) म्हणतात. ढगाळ वातावरणामुळे अस्थमाच्या रुग्णांना जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. यामुळे वेळीच काळजी घेण्याचा सल्ला श्वसनरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

-बालकांमध्ये अस्थमा

शहरातील वाढती बांधकामे, घरातील ओल लागलेल्या भिंती, व्हेंटिलेशनचा अभाव, हवेतील प्रदूषण, वातावरणातील बदल व बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात फुफ्फुसाचे आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी ५ ते ११ वयोगटातील बालकांमध्ये दम्याचे विकार वाढत आहे. भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा असल्याचे आढळून आले आहे.

-अशी घ्यावी काळजी

दमा आजार असलेल्यांनी औषधी वेळेवर घ्यावे. बेकरीचे पदार्थ, थंड पाणी, रासायनिक पदार्थ असलेले हबाबंद पदार्थ टाळावे. फळे व घरचा ताजा आहार घ्यावा. याशिवाय गार हवेत झोपणे, थंड वारा अंगावर घेणे, गोड खाल्ल्यानंतर पाणी घेणे, दुपारी जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. धूळ व प्रदूषणापासून दूर रहावे.

-कोट... (फोटो घ्यावा)

दम्याचे अचूक निदान शक्य आहे आणि त्यावर नियंत्रण मिळविणेही शक्य आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे व धुळीमुळे दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. यामुळे घरामध्ये धूळ साठेल असे कारपेट्स ठेवू नका. घर सफाईच्यावेळी धूळ उडणार नाही, अशा पद्धतीने साफसफाई करा. घरात धूर करण्यापूर्वी म्हणजे, उदबत्ती, कासव छाप अगरबत्ती जाळण्यापूर्वी विचार करा. फुफ्फुस क्षमता चाचणीने निदान पक्के करा. डॉक्टरांनी दिलेले औषधी नियमित घ्या. ज्या पदार्थांची अॅलर्जी आहे ते पदार्थ टाळा.

-डॉ. सुहास कानफाडे, छातीरोगतज्ज्ञ