शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुरतडलेल्या सोयाबीनवर शासन करणार का फवारणी? शेतकऱ्यांचा सवाल

By सुनील चरपे | Updated: December 10, 2022 15:42 IST

अति मुसळधार पावसाचा फटका : कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला

नागपूर : सन २०२२-२३ च्या खरीप हंगामात राज्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले असले तरी सततचे ढगाळ वातावरण, मुसळधार व अति मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकावर झालेल्या रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेसोबतच उत्पादनात घट झाली आहे. उत्पादन खर्च वाढला असताना दर मात्र जेमतेम मिळत असल्याने राज्य सरकार यावर कायमस्वरुपी ताेडगा काढणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोयाबीनपासून केवळ १७ ते १८ टक्के तेल मिळत असले तरी आपल्या देशात या पिकाकडे तेलबिया म्हणून बघितले जाते. देशात सोयाबीन उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. मागील पाच वर्षांपासून साेयाबीनचे पीक विविध किडी आणि रोगांना बळी पडत असल्याने माेठे नुकसान सहन करावे लागते.

चालू खरीप हंगामात जुलै ते ऑक्टोबर या काळात राज्यात सर्वदूर सातत्याने मुसळधार व अति मुसळधार पाऊस कोसळला. पाऊस व सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली. प्रतिकूल हवामानामुळे पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव झाला. पुरामुळे पिके खरडून गेली. रोग व किडींच्या तावडीतून पीक वाचवायचे झाल्यास महागडी कीटक व बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्च वाढतो. तुलनेत दर मात्र सरासरी पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक मिळत नाही. त्यामुळे सोयाबीनचे पीक आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होत चालले आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

उत्पादकतेसोबत उत्पादनात घट

मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात राज्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ३ लाख ४ हजार ७२० हेक्टरने वाढले आहे. सात-आठ वर्षांपूर्वी सरासरी एकरी किमान ९ ते १३ क्विंटल साेयाबीनचे उत्पादन व्हायचे. तीन-चार वर्षांपासून सरासरी एकरी ३ ते ५ क्विंटल साेयाबीनचे उत्पादन हाेत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

या किडींचे संकट कायम

मागील तीन वर्षांपासून सोयाबीनवर येल्लो मोझॅक या बुरशीजन्य रोगासह, खोडमाशी, चक्रीभुंगा, पाने खाणारी हिरवी उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, केसाळ अळी, शेंगा पोखरणारी अळी, पांढरी माशी यासह इतर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने साेयाबीनची उत्पादकता व उत्पादन घटत असून, उत्पादन खर्च वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसामुळे नुकसान

जुलै ते ऑक्टोबर २०२२ या काळात कोसळलेल्या मुसळधार व अति मुसळधार पावसामुळे राज्यातील ३५ लाख २१ हजार ८६९ हेक्टरमधील विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची एकूण संख्या ३८ लाख ४४ हजार ८२६ एवढी आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ४,५३,५८८.८० काेटी रुपयांची आवश्यकता आहे. यात साेयाबीन उत्पादक व पिकाचा समावेश आहे.

सोयाबीनचे पेरणी क्षेत्र (हेक्टर)

विभाग - सन २०२१-२२ - २०२२-२३१) कोकण - ००,००० -            ००,०००

२) नाशिक - १,६६,१७४ - १,९४,८८४३) पुणे - २,२३,४१० - २,९०,७४४

४) कोल्हापूर - १,६७,५७६ - १,७३,४०६५)औरंगाबाद - ५,०८,८३५.७ - ५,७६,१६१

६) लातूर - १७,७९,८३१ - १९,११,३२७७) अमरावती - १४,६९,४६५ - १४,७६,५९०

८) नागपूर - २,८९,८४१ - २,८६,७४१९) एकूण - ४६,०५,१३३ - ४९,०९,८५३

जगात कमी-अधिक पाऊस रोधक तसेच काही कीड व रोग प्रतिबंधक सोयाबीनचे वाण विकसित करण्यात आले आहेत. वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विकसित केलेले सोयाबीनचे वाण भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे.

- मधुसूदन हरणे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट, जिल्हा वर्धा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीnagpurनागपूर