शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आयात धोरणातील बदलांमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST

- भाव आणखी कमी होणार : तूर डाळ २० ते २५ रुपयांनी उतरली नागपूर : केंद्र सरकारने आयात धोरणात ...

- भाव आणखी कमी होणार : तूर डाळ २० ते २५ रुपयांनी उतरली

नागपूर : केंद्र सरकारने आयात धोरणात बदल केल्यानंतर लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच देशात सर्व डाळींचे भाव २५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. ही गरीब आणि सामान्यांसाठी आनंदाची बाब आहे.

दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्यात देशात डाळींच्या भावात तेजी येऊन तूर डाळ १३० रुपये किलो, चणा डाळ ८० ते ९० रुपये, मसूर डाळ ७५ ते ८०, मूग डाळ व उडीद डाळ दर्जानुसार ९० ते १२५ रुपये किलोवर पोहोचली होती. त्यानुसार पुढेही भाववाढीची शक्यता वर्तविली जात होती. पण आता भाव कमी झाल्याने ठोक बाजारात गुरुवारी तूर डाळ दर्जानुसार ८ हजार ते ९४०० रुपये क्विंटल, चणा डाळ ५८०० ते ६४००, मसूर डाळ ६२०० ते ६५००, मूग मोगर व उडीद मोगरचे भाव ६२०० ते ६५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ऑक्टोबरमध्ये गावराणी तुरीचे भाव ८३०० ते ८४०० रुपये होते, ते आता ६३०० ते ६४०० रुपये असून, २ हजार रुपयांची घट झाली आहे. तर आयातीत तुरीचे भाव ७७०० ते ७८०० रुपयांवरून ५८०० ते ५९०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. अर्थात १९०० रुपयांची घसरण झाली आहे. चण्याचे भाव ५६०० ते ५७०० रुपयांवरून ४८०० ते ४९०० रुपयांपर्यंत अर्थात ७०० ते ८०० रुपयांची घट झाल्याचे होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले.

केंद्र सरकारतर्फे आयातीत डाळींसाठी परवाने जारी न करणे हे दरवाढीचे मुख्य कारण आहे. शेतकऱ्यांना चांगला आणि हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये म्हणून सरकार डाळींच्या आयातीत टाळाटाळ करीत होती. पण त्याचा विपरीत परिणाम होऊन भाववाढ झाली आणि लोकांनी ओरड सुरू केल्यानंतर सरकार या विषयावर जागरूक झाली. पुढे स्थिती बिघडण्यापूर्वीच डाळींच्या आयातीसाठी परवाने जारी केले. चार लाख टन तूर डाळ आयातीतील ३१ डिसेंबरपर्यंत परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय नाफेडच्या माध्यमातून बाजारात तूर डाळ विक्रीचा दबाब टाकण्यात आला. मसूर डाळीवर आयात शुल्क कमी करण्यात आले. सरकारच्या या आयात धोरणाने सर्व डाळींचे दर २५ टक्के कमी झाले आहेत. याशिवाय यावर्षी हवामान डाळींसाठी अनुकूल राहिल्याने चांगले पीक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारने आयात धोरणात बदल केल्याने शेतकरी नाराज आहेत. अनेक वर्षांनंतर यंदा ऑक्टोबरमध्ये हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाल्याने शेतकरी खुश होते. पण आता भाव कमी झाल्याने शेतकरी निराश आहेत.

सध्या नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, पुढील महिन्यात वाढणार आहे. त्यामुळे भाव आणखी कमी होतील. फेब्रुवारीमध्ये मसूर व चण्याचे नवीन पीक येईल. त्यामुळे भाव नियंत्रणात राहतील. डाळींचे भाव कमी झाल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट कमी होणार आहे.