शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

२०२२ पर्यंत प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण - हंसराज अहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 5:11 AM

प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून, यामुळे बेघर हा शब्द संपणार आहे. प्रत्येक भारतीयांचे घराचे स्वप्न या योजनेमुळे पूर्णत्वास येणार आहे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

नागपूर - प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून, यामुळे बेघर हा शब्द संपणार आहे. प्रत्येक भारतीयांचे घराचे स्वप्न या योजनेमुळे पूर्णत्वास येणार आहे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत विभागात विविध उत्पन्न गटासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या १५१४ सदनिकांसाठी शनिवारी लक्ष्मीनगर चौकातील सांस्कृतिक सभागृहात आॅनलाईन सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, म्हाडा नागपूर मंडळाचे सभापती तारिक कुरेशी, नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी संजय भिमनवार उपस्थित होते. या वेळी अहीर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच देशातील विषमता दूर करण्यासाठी या योजनेचे महत्त्व वादातीत आहे. आगामी काळात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अधिकाधिक घरे बांधण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांतर्गत चंद्रपूर, हिंगणघाट व नागपूर येथील विविध उत्पन्न गटातील अर्जदारांकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील वर्षी जुलै महिन्यात करण्यात आला होता. या योजनेंतर्गत विविध उत्पन्न गटातील १५५३ सदनिकांचे आॅनलाईन पद्धतीने सोडत काढून वाटप करण्यात आले. ही सोडत यू-ट्युबच्या माध्यमातून नागपूर हाऊसिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट बोर्ड २०१८ च्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.नागपूर मंडळाने आतापर्यंत २५ हजार घरे बांधून १६ हजार भूखंड विकसित केले आहते. आगामी काळात नागपूर येथे १२ हजार २०० घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी संजय भिमनवार यांनी सांगितले.यावेळी गिरीश जोशी, सुनील साधवानी, प्रा. सुमित खत्री, विशाल गायकवाड, श्रीमती सलमा शेख तसेच सुनीलकुमार तिवारी हे पंच उपस्थित होते.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरnagpurनागपूर