शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

विश्वास गमावलेल्या सरकारची देणी देऊ नका, शरद पवार यांचे शेतक-यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 6:00 AM

बळीराजा संकटात असताना सरकारने सरसकट कर्जमाफी दिली नाही, शेतमलाला किंमत दिली नाही, त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या या सरकारविरुद्ध असहकार आंदोलन पुकारून, यापुढे सरकारची कुठलीही देणी देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

नागपूर : बळीराजा संकटात असताना सरकारने सरसकट कर्जमाफी दिली नाही, शेतमलाला किंमत दिली नाही, त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या या सरकारविरुद्ध असहकार आंदोलन पुकारून, यापुढे सरकारची कुठलीही देणी देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. दमदाटी करून, तुरुंगात टाकून आवाज दाबाल, तर तुम्हाला उखडून फेकण्याची ताकद बळीराजात आहे, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे गट), समाजवादी पक्ष, माकप यांनी मंगळवारी राज्य सरकारविरोधात हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या जन आक्रोश व हल्लाबोल मोर्चाने उपराजधानी दणाणून गेली. खा. पवार यांनी भाजपावर हल्ला चढविला. संधी मिळेल, तेव्हा ते उलथून फेकायचे आहे. परिवर्तन होईपर्यंत हल्लाबोल थांबवायचा नाही, असे सांगण्यासही ते विसरले नाही.ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी खा. विजय दर्डा, खा. सुप्रिया सुळे आदी मोर्चाला उपस्थित होते.आरोप करताना लाज वाटायला हवी होतीपाकिस्तानच्या मदतीने गुजरातच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असून, दिल्लीत पाकिस्तानच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही उपस्थित होते, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाचा पवारांनी जोरदार समाचार घेतला.ते म्हणाले, मनमोहन यांच्यासारख्या देशभक्त आणि प्रामाणिक नेत्याचा पाकिस्तानशी संबंध जोडताना भाजपाला लाज वाटली पाहिजे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या मनात असले घाणेरडे विचार कसे येऊ शकतात? देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये बाहेरील ताकदीला स्थान न देण्याची देशाची परंपरा मोडण्याचा प्रयत्न स्वत: पंतप्रधानांकडून होत आहे, याचे दु:ख वाटते, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnagpurनागपूर