शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

पाकिस्तानव्याप्त काश्मीर पाकिस्तानला दान दिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:01 AM

पाकव्याप्त काश्मीरवरील दावा आपण सोडून ते पाकिस्तानला दान दिले का, याचा खुलासा सरकार, भाजप आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्दे नियंत्रण रेषेबाबत खुलासा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जम्मू-काश्मीरच्या संविधानानुसार पाकिस्तानव्याप्त काश्मीरसाठी विधानसभेच्या जागा राखीव होत्या. यामुळे त्याचा आपल्याशी संबंध होता. त्या आधारावरच पाकव्याप्त काश्मीरवर आपण दावा करीत होतो. केंद्र्र सरकारने कलम ३७० रद्द करून पाकव्याप्त काश्मीरचे भारताशी असलेले संबंध तोडले आहेत. यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा संबंध संपला आहे. ज्या जागेसाठी लाखो सैनिक शहीद झाले, त्या पाकव्याप्त काश्मीरवरील दावा आपण सोडून ते पाकिस्तानला दान दिले का, असा सवाल करीत याचा खुलासा सरकार, भाजप आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली. अमेरिकेच्या इशाऱ्यावर जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, हे कलम रद्द केल्याने आसाम, नागालँड, मिझोरम, मेघालयसह अनेक राज्यांना देण्यात आलेला विशेष दर्जाही आपोआप संपुष्टात येईल. मराठवाडा, विदर्भाला देण्यात आलेला विशेष दर्जाही जाईल. पत्रपरिषदेला आ. बळीराम शिरस्कर, वंचित बहुजन आघाडी विदर्भ प्रमुख राजेंद्र महाडोळे, माजी राज्यमंत्री रमेश गजभिये, माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी, संजय हेडाऊ , सागर डबरासे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, शहराध्यक्ष रवि शेंडे उपस्थित होते.पूरग्रस्तांना शासनाची अजूनही मदत नाहीसरकारकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पैसा आहे. परंतु, पूरग्रस्तांसाठी नाही, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गेल्या पाच, सात दिवसांपासून पाण्याखाली असताना सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. मंत्री, खासदार दौरे करीत आहेत. परंतु पूरग्रस्तांना मदत मात्र मिळालेली नाही. जी काही मदत होत आहे ती केवळ सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.धरणांसाठी नियोजन समिती असावीकर्नाटकमधील आलमट्टी धरणाचे दरवाजे बंद असल्याने नदीचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. हे पूर्णपणे भरल्यास सांगली शहर वर्षभर पाण्याखाली राहील. कृष्णा, आलमट्टी व इतर धरणांच्या नियोजनांसदर्भात एक समिती गठित करण्याची मागणीसुद्धा अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी केली.२८८ जागा लढण्याची तयारीकाँग्रेसकडून अद्याप कोणत्याही प्रकारची बोलणी झाली नाही. चर्चा झाल्यास जागांबाबत ठरवू. आमची सर्व २८८ जागा लढण्याची तयारी आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर