शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

पाच वर्षांखालील मुलांमध्ये अतिसार मृत्यूचे मुख्य कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:09 AM

नागपूर : भारतात दरवर्षी १७ लाख बालकांचा मृत्यू होतो. यांतील जवळपास सहा लाख बालके अतिसारामुळे बळी पडतात. पाच वर्षांखालील ...

नागपूर : भारतात दरवर्षी १७ लाख बालकांचा मृत्यू होतो. यांतील जवळपास सहा लाख बालके अतिसारामुळे बळी पडतात. पाच वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण अतिसार आहे. यावर क्षार संजीवनी व झिंकचा उपचार दिल्यास बालमृत्यूंचे प्रमाण निश्चित कमी करता येऊ शकते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली.

‘अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स असोसिएशन’च्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात लहान मुलांमधील अतिसार या विषयावर तज्ज्ञँनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय धोटे, सचिव डॉ. पंकज अग्रवाल, उपाध्यक्ष डॉ. संजय पाखमोडे, सहसचिव डॉ. अर्चना जयस्वाल, मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आदी उपस्थित होते.

डॉ. धोटे म्हणाले, पाच वर्षांखालील मुलाला सुमारे दोन-तीन वेळा अतिसाराच्या आजाराला सामोरे जावे लागते. उपचार न झाल्यास गंभीर जलशुष्कतेमुळे धोका वाढतो. यावरील उपचारात झिंक हे अल्प प्रमाणात लागणारे खनिज आहे. जे शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्याकरिता गरजेचे ठरते. पेशीच्या वाढीमध्ये आणि प्रतिकार यंत्रणेच्या कार्यामध्येही याची भूमिका महत्त्वाची ठरते, असेही ते म्हणाले. डॉ. अग्रवाल म्हणाले, अतिसारावर क्षार संजीवनीसोबतच (ओआरएस) झिंक पुरेसे घेतल्यास जुलाबाचा कालावधी आणि तीव्रता कमी होते. अतिसाराची स्थिती सुधारते. झिंक हे अतिसाराच्या उपचारामध्ये रोखथामचे काम करते.

.... तर दोन महिने लागण होण्याची शक्यता कमी

डॉ. पाखमोडे म्हणाले, अतिसार झाल्यानंतर झिंक आणि क्षार संजीवनी १४ दिवसांपर्यंत दिल्यास पुढील दोन ते तीन महिन्यांपर्यंत अतिसाराची लागण होण्याची शक्यता कमी होते. डॉ. जयस्वाल म्हणाल्या, झिंकचे दुष्परिणाम सामान्य असले तरी ते देण्यापूर्वी बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

दीर्घ मुदतीच्या अतिसाराचे आरोग्यावर गंभीर परिणाम

डॉ. गावंडे म्हणाले, दीर्घ मुदतीच्या अतिसाराचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अपचनामुळे वारंवार जुलाब होण्यास सुरुवात होते, मात्र जंतुसंसर्ग, अन्नबाधा, अन्नविषबाधा आणि औषधाच्या अतिसेवनामुळेही अतिसार होतो. प्रतिजैविके आणि आम्लताविरोधी औषधांमुळे वारंवार जुलाब होतात. दीर्घ मुदतीचा अतिसार आणि लघुमुदतीचा अतिसार असे त्याचे दोन प्रकार ढोबळमानाने दिसून येतात.