शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांत ७७ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 21:49 IST

Nagpur News पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी विक्रमी नोंद झाली. धक्कादायक म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ७७ टक्के रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,२०७ तर मृतांची संख्या ९वर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे चार वर्षांतील सर्वाधिक वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : डेंग्यूचा धोका वाढतच चालल्याने चिंता वाढली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी विक्रमी नोंद झाली. धक्कादायक म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ७७ टक्के रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,२०७ तर मृतांची संख्या ९वर पोहोचली आहे. (Dengue cases increase by 77% in six districts of East Vidarbha)

पूर्व विदर्भाला डेंग्यूने घातलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. ताप कमी झाल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष होत असल्याने गंभीर रुग्णांची संख्याही वाढली आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे मिळून २०१८ मध्ये ११९० रुग्ण - ११ मृत्यू, २०१९ मध्ये १३१६ रुग्ण - ११ मृत्यू, २०२० मध्ये ५०३ रुग्ण - २ मृत्यू तर ऑगस्ट २०२१पर्यंत २२०७ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. पाऊस लांबल्यास सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांतही मोठ्या संख्येत डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचा सर्वाधिक प्रकोप

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांच्या तुलनेत या वर्षी नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचा सर्वाधिक प्रकोप दिसून येत आहे. २०१९मध्ये ७४१, २०२०मध्ये १६१ तर ऑगस्ट २०२१पर्यंत १४०७ रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल चंद्रपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यात २०१९मध्ये ४६५, २०२०मध्ये २०४ तर २०२१मध्ये ३६० रुग्ण आढळून आले. गोंदिया जिल्ह्यात २०१९मध्ये ३७, २०२०मध्ये ४ तर या वर्षी १२१, भंडारा जिल्ह्यात २०१९ मध्ये १०, २०२०मध्ये ८ तर २०२१मध्ये ३६ तर गडचिरोली जिल्ह्यात २०१९मध्ये ११, २०२०मध्ये १६ तर २०२१मध्ये २५ रुग्णांची नोंद झाली.

-ऑगस्ट महिना ठरला धोकादायक

ऑगस्ट महिन्यात सहाही जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचा धोका वाढताना दिसून आला. नागपूर ग्रामीणमध्ये ७९० तर शहरात ६१७, भंडारा जिल्ह्यात ३६, गोंदिया जिल्ह्यात १२१, चंद्रपूर ग्रामीणमध्ये १९३ तर शहरात १६७, गडचिरोली जिल्ह्यात २५ तर वर्धा जिल्ह्यात २५८ रुग्ण आढळून आले.

-डेंग्यूची जबाबदारी प्रत्येकाची

डेंग्यूला नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी. घरात व परिसरात पाणी साचून राहणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. दिवसाही झोपताना मच्छरदाणीचा वापर करायला हवा. संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत. डेंग्यूचा डास हा साधारण सकाळी व सायंकाळी चावतो. यामुळे या वेळेत विशेष काळजी घ्यावी. कुठलीही लक्षणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. श्याम निमगडे, सहायक संचालक (हिवताप) आरोग्य सेवा, नागपूर

 

टॅग्स :dengueडेंग्यू