शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

अकरावी प्रवेशासाठी ‘तारीख पे तारीख’: तांत्रिक बिघाडाने यादीच अडकली

By निशांत वानखेडे | Updated: June 26, 2025 20:38 IST

पुन्हा फज्जा : विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दिवसभर मन:स्ताप

नागपूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी गेल्या दीड महिन्यापासून ताटकळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून पुन्हा झटका मिळाला आहे. विद्यार्थ्यांना अलाॅट झालेल्या महाविद्यालयांची यादी २६ जूनला लागणार हाेती. मात्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळात सहाव्यांदा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रक्रिया पुन्हा थांबविण्यात आली. त्यामुळे यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दिवसभर प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. आता ही यादी ३० जूनला लावणार असल्याचे केंद्रीय प्रवेश समितीने जाहीर केले.

गुरुवारी मिळालेल्या महाविद्यालयांची यादी लागणार म्हणून सकाळपासून विद्यार्थी व पालक तयारीत हाेते. साेबतच माध्यमिक शाळांचे प्राचार्य व शिक्षकही यादीच्या प्रतीक्षेत हाेते. वारंवार शिक्षण विभागाचे संकेतस्थळ तपासले जात हाेते. ग्रामीण भागातील विद्यार्थीही पालकांसाेबत यादी पाहण्यासाठी नागपुरात सकाळपासून तळ ठाेकून हाेते. अनेक महाविद्यालयांचे कर्मचारीही शिक्षण उपसंचालक कार्यालयात ताटकळत हाेते. मात्र महाविद्यालयांची यादी दिवसभर जाहीर झाली नाही. दिवसभराचा मन:स्ताप सहन केल्यानंतर सायंकाळी ६ वाजता सर्वांनी परतीचा मार्ग धरला. अनेकांनी याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी यादीबाबत नकारच मिळाला.

सहाव्यांदा बदलले प्रवेशाचे वेळापत्रकदहावीचा निकाल १३ मे राेजी जाहीर झाला. जाहीर झाल्यानुसार अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात आली हाेती. सराव नाेंदणीनंतर २१ मेपासून प्रत्यक्ष नाेंदणी सुरू हाेणार हाेती. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ ठप्प पडले आणि प्रक्रिया खाेळंबली. पुढे २६ मेपासून पुन्हा नाेंदणी सुरू करण्यात आली. ३ जूनपर्यंत असलेली मुदत पुढे ५ जून व नंतर ८ जूनपर्यंत वाढविण्यात आली. ११ व १२ जूनला महाविद्यालयीन काेटा प्रवेश घेण्यात आले. १४ जूनपासून सामान्य प्रवेश सुरू हाेणार हाेते. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया तब्बल १०-१२ दिवस पुढे ढकलली. म्हणजे दहावीच्या निकालाला तब्बल दीड महिना लाेटल्यानंतर आता कुठे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात हाेणार हाेती, पण आता प्रवेश प्रक्रिया पुन्हा रेंगाळली आहे. आता ३० जूनला यादी जाहीर हाेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे सहाव्यांदा वेळापत्रक बदलण्यात आले.

जुलै लागूनही प्रवेश नाही

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला संस्थाचालकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचा विराेध असताना राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण विभागाने कुणाच्याही विराेधाची दखल घेतली नाही. उलट पूर्वी महापालिका हद्दीतील काॅलेज मध्ये सुरू असलेले ऑनलाईन प्रवेश यावर्षी राज्यभरात लागू केले. तांत्रिक व्यवस्था सांभाळणारी सर्व यंत्रणा आहे, की नाही, हे तपासण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. या बेजबाबदारपणाचा फटका आता विद्यार्थी व पालकांनाच भाेगावा लागताे आहे. जुलै महिन्यात महाविद्यालये सुरू हाेणार हाेती. मात्र यावर्षी प्रवेशच झाले नाहीत.

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाEducationशिक्षणnagpurनागपूर