शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अकरावी प्रवेशासाठी ‘तारीख पे तारीख’: तांत्रिक बिघाडाने यादीच अडकली

By निशांत वानखेडे | Updated: June 26, 2025 20:38 IST

पुन्हा फज्जा : विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दिवसभर मन:स्ताप

नागपूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी गेल्या दीड महिन्यापासून ताटकळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून पुन्हा झटका मिळाला आहे. विद्यार्थ्यांना अलाॅट झालेल्या महाविद्यालयांची यादी २६ जूनला लागणार हाेती. मात्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळात सहाव्यांदा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रक्रिया पुन्हा थांबविण्यात आली. त्यामुळे यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दिवसभर प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. आता ही यादी ३० जूनला लावणार असल्याचे केंद्रीय प्रवेश समितीने जाहीर केले.

गुरुवारी मिळालेल्या महाविद्यालयांची यादी लागणार म्हणून सकाळपासून विद्यार्थी व पालक तयारीत हाेते. साेबतच माध्यमिक शाळांचे प्राचार्य व शिक्षकही यादीच्या प्रतीक्षेत हाेते. वारंवार शिक्षण विभागाचे संकेतस्थळ तपासले जात हाेते. ग्रामीण भागातील विद्यार्थीही पालकांसाेबत यादी पाहण्यासाठी नागपुरात सकाळपासून तळ ठाेकून हाेते. अनेक महाविद्यालयांचे कर्मचारीही शिक्षण उपसंचालक कार्यालयात ताटकळत हाेते. मात्र महाविद्यालयांची यादी दिवसभर जाहीर झाली नाही. दिवसभराचा मन:स्ताप सहन केल्यानंतर सायंकाळी ६ वाजता सर्वांनी परतीचा मार्ग धरला. अनेकांनी याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी यादीबाबत नकारच मिळाला.

सहाव्यांदा बदलले प्रवेशाचे वेळापत्रकदहावीचा निकाल १३ मे राेजी जाहीर झाला. जाहीर झाल्यानुसार अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात आली हाेती. सराव नाेंदणीनंतर २१ मेपासून प्रत्यक्ष नाेंदणी सुरू हाेणार हाेती. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ ठप्प पडले आणि प्रक्रिया खाेळंबली. पुढे २६ मेपासून पुन्हा नाेंदणी सुरू करण्यात आली. ३ जूनपर्यंत असलेली मुदत पुढे ५ जून व नंतर ८ जूनपर्यंत वाढविण्यात आली. ११ व १२ जूनला महाविद्यालयीन काेटा प्रवेश घेण्यात आले. १४ जूनपासून सामान्य प्रवेश सुरू हाेणार हाेते. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया तब्बल १०-१२ दिवस पुढे ढकलली. म्हणजे दहावीच्या निकालाला तब्बल दीड महिना लाेटल्यानंतर आता कुठे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात हाेणार हाेती, पण आता प्रवेश प्रक्रिया पुन्हा रेंगाळली आहे. आता ३० जूनला यादी जाहीर हाेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे सहाव्यांदा वेळापत्रक बदलण्यात आले.

जुलै लागूनही प्रवेश नाही

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला संस्थाचालकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचा विराेध असताना राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण विभागाने कुणाच्याही विराेधाची दखल घेतली नाही. उलट पूर्वी महापालिका हद्दीतील काॅलेज मध्ये सुरू असलेले ऑनलाईन प्रवेश यावर्षी राज्यभरात लागू केले. तांत्रिक व्यवस्था सांभाळणारी सर्व यंत्रणा आहे, की नाही, हे तपासण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. या बेजबाबदारपणाचा फटका आता विद्यार्थी व पालकांनाच भाेगावा लागताे आहे. जुलै महिन्यात महाविद्यालये सुरू हाेणार हाेती. मात्र यावर्षी प्रवेशच झाले नाहीत.

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाEducationशिक्षणnagpurनागपूर