शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
2
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
3
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
4
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
5
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
6
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
7
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
8
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
9
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
10
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
11
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
12
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
13
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
14
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
15
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
16
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
17
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
18
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
19
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
20
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधांचे पालन न केल्यामुळेच इटलीसमोर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:16 IST

‘‘रुग्णवाहिका जेव्हा रस्त्यांनी जातात तेव्हा तेथील रहिवाशांच्या अंगावर काटा उभा राहतो. मनात विचार येतो की, कोरोनाने जीव घेतलेल्या त्या दुर्दैवी लोकांच्या यादीत आणखी एकाची भर पडली की काय? इटली म्हणजे अनेकांच्या स्वप्नांना साकार करणारा देश.

ठळक मुद्देकोरोनाला भारतीयांनी गांभीर्याने घ्यावे मीनाक्षी आणि ज्ञानेश भास्कर यांचे कळकळीचे आवाहन

अंकिता देशकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दुसऱ्या महायुद्धात इटलीला फारच उद््ध्वस्त व्हावे लागले. त्यानंतर युरोपमधील अत्यंत उत्साही, तरतरीत अशा इटालियन लोकांसमोर प्रथमच कोरोना विषाणूने फार मोठे संकट उभे केले आहे. इटलीने निर्बंधांचे पालन न केल्यामुळेच इटलीसमोर फार मोठे संकट उभे ठाकले आहे.‘‘रुग्णवाहिका जेव्हा रस्त्यांनी जातात तेव्हा तेथील रहिवाशांच्या अंगावर काटा उभा राहतो. मनात विचार येतो की, कोरोनाने जीव घेतलेल्या त्या दुर्दैवी लोकांच्या यादीत आणखी एकाची भर पडली की काय? इटली म्हणजे अनेकांच्या स्वप्नांना साकार करणारा देश.आज याच देशाचे रूपांतर असे भयाण स्वप्नात होईल याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. लोकांनी आता हळूहळू आशा सोडून देण्यास सुरुवात केली आहे; परंतु आपली श्रद्धा नष्ट होणार नाही याची ते अजूनही कारणे शोधत आहेत,’’ असे मीनाक्षी यांनी म्हटले. संपूर्ण इटलीत परिस्थिती वाईट असून कोविड-१९ च्या फटक्यातून कोणताही प्रांत सुरक्षित राहिलेला नाही, असे भास्कर यांनी सांगितले. सध्या देशात संपूर्ण लॉकडाऊन असून लोकांना फक्त अत्यावश्यक खरेदीसाठीच रस्त्यांवर येऊ दिले जात आहे. इटलीत परिस्थिती इतकी का खालावली, असे भास्कर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘अगदी सुरुवातीपासूनच लोकांनी सरकारने घातलेल्या निर्बंधांचे पालन केले असते आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला असता तर त्यापैकी बहुतेक जणांना कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहता आले असते.’’ भास्कर यांनी सांगितले की, ती आता दारांच्या कड्या, मुठी, कार्सचे सीट बेल्टस् जंतुनाशक वापरून पुसून घेते. हे कुटुंब १४ मार्च रोजी भारतात येणार होते; परंतु लॉकडाऊनमुळे त्यांचे येणे रद्द झाले.या कठोर परीक्षेच्या दिवसांत हे जोडपे एवढे आशावादी कसे राहू शकले? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘‘माझ्या कुटुंबियांनी दिलेले प्रेम व घेतलेली काळजी आणि दूरध्वनीद्वारे आमच्या संपर्कात असलेले मित्र हे आमच्या सकारात्मकतेचे स्रोत आहेत.’’ देशात पोलिसांकडून मदत व दयाळूपणा अनुभवास येतो का, असे विचारले असता भास्कर यांनी कळवले की, ‘‘वयोवृद्धांच्या मदतीसाठी ते धावतात, त्यांना अन्न, खाद्यपदार्थ व औषधे आणून देण्याचे काम ते करतात. वसाहतींत मदत करताना पोलीस अनेक ठिकाणी दिसतात. ते नेहमीच मदतीचा हात पुढे करताना दिसतील.’’परिस्थितीचे गांभीर्य संपूर्ण जगात लोकांनी समजून घेण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. लोक अगदी सहजपणे प्रतिबंधक उपायांचे, नियमांचे उल्लंघन करतात व मला काहीच होणार नाही, असा समज करून घेतात; पण असे वर्तन करणाऱ्यांना कोरोना व्हायरस महामारीने चुकीचे सिद्ध केले आहे.इटलीने परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही व आज जगात सगळ्यात मोठा फटका सोसत असलेला असा तो देश बनला आहे. सगळ्यांसाठीच अत्यंत कठोर परीक्षेच्या या दिवसांत अत्यावश्यक सेवा पुरवत असलेल्या लोकांबद्दल आपण प्रत्येकाने कृतज्ञ राहिले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले. अशा मदतीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर उपलब्धही आहेत. इटलीने ज्या चुका केल्या त्यापासून भारताने धडा घेऊन त्या करू नयेत, असेही आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस