शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे

By admin | Updated: January 11, 2015 00:51 IST

पोलिसांच्या सदोष तपासामुळे अनेकदा पुरावा असूनही गुन्हेगार सुटतात. महाराष्ट्रात आरोपी सुटण्याचे प्रमाण अधिक आहे. ही चिंतेची बाब असून गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, असे प्रतिपादन

उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन : जीवनगौरव पुरस्कार प्रदान नागपूर : पोलिसांच्या सदोष तपासामुळे अनेकदा पुरावा असूनही गुन्हेगार सुटतात. महाराष्ट्रात आरोपी सुटण्याचे प्रमाण अधिक आहे. ही चिंतेची बाब असून गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, असे प्रतिपादन सुविख्यात कायदेपंडित अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी शनिवारी केले. त्यांना पद्मगंधा प्रतिष्ठानचा २०१५ या वर्षाचा नलिनी बाळकृष्ण पुरस्कृत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सायंटिफिक सभागृहात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे , उद्घाटक वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, प्रमुख वक्ते व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती किशोर रोही, प्राचार्य बाबूराव देसाई, प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष शुभांगी भडभडे, नलिनी बाळकृष्ण देवपुजारी आदी व्यासपीठावरील मान्यवरांनी निकम यांना सन्मानाने हा पुरस्कार प्रदान केला. मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. निकम म्हणाले, वर्षानुवर्षे न्यायालयात खटल्याची सुनावणी होत नाही. शीघ्र गती न्यायालयाप्रमाणे उच्च न्यायालयाचे निकाल का लागत नाही? राज्याची सुबत्ता ही सर्वसामान्यांचा न्यायालयावरील विश्वासावर अवलंबून असते. कायदा व सुव्यवस्था नांदायची असेल तर यासाठी कायद्याचे पुजारी होणे गरजेचे आहे. अर्थातच यात न्यायाधीशांवर मोठी जबाबदारी आहे. न्यायालयाच्या निर्णयाची जनसामान्यात काय प्रतिक्रि या आहे यासाठी त्यांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील महत्त्वाच्या खटल्यांची माहिती दिली. राज्यात आरोपी सुटण्याचे प्रमाण अधिक आहे, ते कमी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. या संदर्भात त्यांनी चर्चा केली. नंतर या संंदर्भातील फाईल अवलोकनासाठी पाठविली. २६/११ चा हल्ला दहशतवादी हल्ला हा पाक पुरस्कृतच होता. त्यांना भारताविरुद्ध अघोषित युद्ध पुकारावयाचे होते. जीवनगौरव पुरस्कार त्यांचे वडील दादासाहेब निकम यांना समर्पित करून त्यांच्या शिकवणीतूनच मी घडलो आहे. सामान्य माणूस हीच आपली खरी शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.जीवनात कुठल्या ना कुठल्या कारणामुळे प्रत्येकाचा कायद्याशी संबंध येतो. एकवेळ दोषी सुटला तर चालेल पण निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये हे कायद्याचे तत्त्व आहे. परंतु या तत्त्वाचा गुन्हेगार गैरफायदा घेत असल्याने यावर विचार करण्याची गरज असल्याचे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती किशोर रोही यांनी व्यक्त केले. डॉ. पंकज चांदे, डॉ. बाबुराव देसाई, गिरीश गांधी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. शुभांगी भडभडे यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. संचालन प्रभा देऊ स्कर यांनी केले.(प्रतिनिधी)कसाबला बिर्यानी दिली जात नव्हती!कमी वयात कसाब दहशतवादी कसा झाला याची माहिती जाणून घेण्यासाठी न्यायालयात त्याच्याशी चर्चा करीत होतो तेव्हा त्याने डोळे चोळले. परंतु काही वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी कसाबच्या डोळ्यात पाणी आल्याची ब्रेकिंग न्यूज प्रकाशित केली. सुनावणीनंतर न्यायालयातून बाहेर पडल्यावर वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मला गराडा घातला. कसाबबाबत प्रश्न विचारू लागले. तेव्हा थट्टेने कसाबला मटन बिर्यानी हवी आहे, असे म्हणालो. वास्तविक त्याला ती कारागृहात पुरवली जात नव्हती, असा गौप्यस्फोट निकम यांनी केला.