शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी एक्स्प्रेस हायवेचे बांधकाम १ आॅक्टोबरपासून

By admin | Updated: May 6, 2017 02:28 IST

सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जामठा स्टेडियममागील महामार्गावरील शिवमडका गावापासून भिवंडीपर्यंत

शिवमडका ते भिवंडी ७०० कि़मी. : निविदा प्रक्रिया सुरू लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जामठा स्टेडियममागील महामार्गावरील शिवमडका गावापासून भिवंडीपर्यंत ७०० कि़मी.च्या समृद्धी एक्स्पे्रस हायवेच्या बांधकामाला १ आॅक्टोबरपासून शुभारंभ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. हा प्रकल्प पूर्णत: राज्य शासनाचा असल्याचे त्यांनी सांगितले. १० हजार हेक्टर जागेवर प्रकल्प समृद्धी एक्स्प्रेस हायवे प्रकल्प १० हजार हेक्टरवर राहणार आहे. एकूण जागेपैकी ५०० हेक्टर जागा जंगलाची तर ५०० हेक्टर शासकीय जागा आहे. ४५०० हेक्टर जागा एक पिकाची, ३५०० हेक्टर जागा दुबार पिकाची आणि जवळपास १००० ते १२०० हेक्टर जागा बारमाही पिकाची आहे. यापैकी ६०० हेक्टर जागा नगर आणि नाशिक जिल्ह्यात आहे. १० हजार हेक्टरमध्ये १५ हजार जणांची जमीन घेण्यात येणार आहे. १६ पॅकेजमध्ये निविदा नागपूर ते भिवंडी ७०० कि़मी. आणि त्यानंतरचा २४ कि़मी.चा हायवे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) बांधणार आहे. हायवेच्या कामासाठी २५ मेपर्यंत पूर्व पात्र निविदा प्रक्रिया आणि १ आॅगस्टला वित्तीय निविदा बोलविण्यात येणार आहे. या कामासाठी १६ पॅकेजमध्ये निविदा काढण्यात येणार आहे. जवळपास ६७० कि़मी.ची संयुक्त मोजणी झाली आहे. मुंबई ते घुटी (इगतपुरी) या ८० कि़मी.चा हायवे पूर्णत: सिमेंटचा राहणार असून उर्वरित ६२० कि़मी. रस्ता डांबरी राहील. हायवेवर अनेक ठिकाणी बॅरिअर राहणार आहे. हायवेमुळे १० जिल्ह्याचा विकास आणि सहा विभाग जोडले जाणार आहे. पूर्णत: ग्रीन फिल्ड प्रकल्प हायवे कुठल्याही गावाला जोडणारा नसून पूर्णत: ग्रीन फिल्ड स्वरुपाचा आहे. आठ पदरी हायवे प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ जुलै २०१५ विधानसभेत केली आणि अंमलबजावणीसाठी एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आला. १५ सप्टेंबर २०१५ ला सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात आली. भौतिक आणि आर्थिकतेच्या आधारावर प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यात आले. अमरावती आणि नाशिकमध्ये विरोध जागेच्या अधिग्रहणासाठी प्रारंभी ३९१ गावातून विरोध झाला. पण त्यातील बहुतेक गावकरी जागा देण्यास तयार झाल्यामुळे विरोध निवळला. नाशिक जिल्ह्यात आठ कि़मी.करिता चार गावांसाठी आणि अमरावतीमध्ये १३ कि़मी. करिता सात ते आठ गावातून विरोध सुरू आहे. थोड्याशा विरोधामुळे प्रकल्पाची गती थांबणार नाही, असे मापलवार म्हणाले. जमिनीचे अधिग्रहण २०१३ च्या जागा अधिग्रहण कायद्यानुसार होणार असून मालकाला मूल्याच्या जवळपास तीन ते चार पट रक्कम मिळणार आहे. ७०० कि़मी.करिता १४०० रुपये टोल! ७०० कि़मी.चे अंतर कापताना कारला टोलकरिता १४०० रुपये भरावे लागणार आहे. अर्थात प्रति कि़मी. २ रुपये खर्च येईल. सध्या मुंबई-पूर्ण हायवेवर कारला प्रति कि़मी. २.३५ रुपये आणि मोठ्या वाहनाला ६.५० रुपये टोल लागतो. केंद्र सरकारच्या २००८ च्या धोरणानुसार बेस रेटच्या आधारावर दर तीन वर्षांत १८ टक्के वाढ होणार आहे. १०० टक्के कर्ज उभारणी ४० हजार कोटींच्या प्रकल्पासाठी विविध बँकांकडून १०० टक्के कर्ज घेण्यात येणार आहे. एमएसआरडीसी १० हजार कोटींचे कर्ज घेणार आहे. एकूण कर्जापैकी ७ ते १० हजार कोटी रुपये जमीन अधिग्रहणावर खर्च होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी या प्रकल्पाला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी आहे. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी नागपुरात सुनावणी झाली असून मंजुरी मिळाली आहे. टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्यांमध्ये सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा काहीच अडथळा राहणार नाही. उद्योग, व्यवसाय व रोजगाराचे उद्दिष्ट उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराचा दृष्टिकोन ठेवून हायवेची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे कृषी आधारित उद्योगाची वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य भारतातून कार्गो वाहतुकीला वाव मिळेल. पत्रपरिषदेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (प्रशासन व वित्त) किरण कुरुंदकर आणि उल्हास डेबलवार उपस्थित होते.