शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उमेदवारी अर्ज वितरणात घोळ : उमेदवार संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 22:10 IST

उमेदवारी अर्ज वितरणात घोळ झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात दोन व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत शेकडो लोकांनी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) नेले, परंतु एकानेही उमेदवारी अर्ज भरलेला नाही. दरम्यान उमेदवारी अर्ज वितरणात घोळ झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात दोन व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.नीलेश नागोलकर आणि विजय मारोडकर असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. या दोघांनीही विधानसभा निवडणुकीत उभे राहण्यासाठी उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) घेतले. नीलेश नागोलकर हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी नागपूर पश्चिम आणि नागपूर दक्षिण-पश्चिम या दोन मतदार संघातून लढण्यासाठी अर्ज घेतले. तेव्हा दोन्ही अर्जात तफावत दिसून आली. नामनिर्देशन पत्रासोबत दिली जाणारी आवश्यक कागदपत्रे एका मतदार संघाच्या अर्जासोबत होती तर दुसऱ्या मतदार संघातील अर्जासोबत नव्हती. तेव्हा त्यांनी इतरही मतदारसंघातील नामनिर्देशन पत्राचा संच घेऊन तपासणी केली. तेव्हा त्यातही हाच प्रकार आढळून आला. उदाहरणार्थ नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक प्रतिनिधीचे नेमणूक पत्र, प्रतिनिधीची नेमणूक रद्द करणे, उमेदवारी मागे घेण्यासंबंधीची सूचना, अमानत रक्कम परत करण्यासाठीचा अर्ज नागपूर पश्चिम मतदार संघाच्या संचात आहे. परंतु नागपूर दक्षिण पश्चिमच्या संचात नाही. तीच बाब स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबतचे पत्र दक्षिण-पश्चिममध्ये आहे तर पश्चिममध्ये नाही. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशांची कॉपी दक्षिण-पश्चिमच्या संचात आहे, पण पश्चिममध्ये नाही. वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करणेबाबतचे प्रपत्र दिले आहे. ते दक्षिण-पश्चिममध्ये नाही. वाहन परवान्याचा नमुना नाही. निवडणूक चिन्हांचा नमुना आदी आवश्यक कागदपत्रे काही मतदार संघाच्या संचासोबत जोडली आहेत तर काहींसोबत नाही. यासंदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर त्यांनी जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच या तक्रारीची एक प्रत निवडणूक आयुक्त व मुख्य निवडणूक आयुक्तांकडेही पाठविली आहे.अपक्षांना निवडणुकीतून बाद करण्याचे षडयंत्रनामनिर्देशन वितरणात अधिकाऱ्यांनी जो घोळ घातला आहे, तो जाणीवपूर्वक असल्याचे दिसून येते. अपक्ष उमेदवार नवीन असतात. त्यांना यासंदर्भात काही समजत नाही. त्यांना निवडणुकीतूनच बाद करण्याचे हे षडयंत्र असावे. कारण यासंदर्भात मी जेव्हा निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्याशी कुणी बोलायलाही तयार नव्हते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा कुठे अधिकारी भेटले. परंतु ते मला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. यासंदर्भात आपण सर्व संबंधितांकडे तक्रार केली असून उमेदवारांनी योग्यप्रकारे नामनिर्देशनपत्राचे वाटप व्हावे आणि योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी केली आहे.नीलेश नागोलकर (तक्रारकर्ते)सचिव, राष्ट्रनिर्माण संघटननिवडणूक विभाग म्हणतो घोळ नाहीयासंदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांना विचारणा केली असता त्यांनी उमेदवारी अर्जाच्या वितरणात कुठलाच घोळ नसल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे होते की, नामनिर्देशनपत्रातील भाग एक व फॉर्म नंबर २६ हे दोनच आवश्यक आहे. इतर फॉर्म हे उमेदवारी अर्ज भरल्यानंतरचे आहेत. काही मतदारसंघातील अधिकाऱ्यांनी संपूर्ण फॉर्म एकाचवेळी वितरित केले. त्यामुळे यात घोळ किंवा त्रुटीचा संबंधच येत नाही.मग प्रशिक्षणाचा फायदा कायनिवडणुकीसंदर्भात प्रत्येक गोष्टीची नियमावली निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहे. यासंदर्भात अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते. यावेळी नामनिर्देशनपत्र वितरणाबाबतही सर्व अधिकाऱ्यांना एकच निर्देश मिळालेले असतील. अशावेळी नामनिर्देशनपत्राचे वितरण करण्यासंदर्भातच एकवाक्यता नसेल तर मग अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय