शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज सुरू, निकाल अडले!

By admin | Updated: July 2, 2015 03:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.

कुलगुरूंचे आश्वासन हवेतच विरले : अंतिम वर्षाचे निकाल नाहीचनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल दोन ते तीन दिवसांत लावण्यात येतील, असे आश्वासन सुमारे आठवडाभराअगोदर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिले होते. परंतु अद्यापदेखील विद्यापीठाचे निकाल लागलेले नसून विद्यापीठाकडून महाविद्यालयांवर याचे खापर फोडण्यात येत आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी उन्हाळी परीक्षांच्या निकालांची गाडी अतिशय संथ वेगाने सुरू आहे. मागील मंगळवारी यासंदर्भात परीक्षा विभागात बैठक झाली. अनेक महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यापीठाला पाठविलेलेच नसल्याची बाब समोर आली. कमीतकमी अंतिम वर्षाचे निकाल परीक्षा विभागाने लवकरात लवकर लावावेत व ज्यांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आलेले नाहीत त्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवावेत, असे निर्देश कुलगुरूंनी दिले होते. अवघ्या २० महाविद्यालयांमुळे ‘बीएस्सी’च्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत. कला व वाणिज्यच्या निकालाची ‘स्क्रूटिनी’ राहिली होती. ती आता झाली असून लवकरात लवकर निकाल लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु आठवडा उलटूनही अंतिम वर्षांचे निकाल अद्याप लागले नाहीत. (प्रतिनिधी)ही कुठली समाधानकारक स्थिती९५६ पैकी अवघ्या २५० परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. परीक्षा विभाग कोलमडलेला असताना कुलगुरू मात्र ते मान्य करायला तयार नाहीत. मागील आठवड्यात त्यांना याबाबत विचारणा केली असता निकालाची स्थिती समाधानकारक असून, जाहीर झालेल्यांपैकी ७५ टक्के निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात आले आहेत, असा दावा त्यांनी केला होता. परंतु हजारो विद्यार्थ्यांचे निकाल रखडलेले असताना कुलगुरूंना ही स्थिती समाधानकारक कशी वाटते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.उच्च शिक्षणाची संधी जाण्याची भीतीअंतिम वर्षांच्या अनेक विद्यार्थ्यांना बाहेरील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे. अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत निकालच लागले नाही तर प्रवेशाची संधी जाते की काय अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. निकाल लवकर लावण्याचे दावे दरवेळा करण्यात येतात, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कधीच का होत नाही, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.