शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

कॅनमधून विकले जाणारे थंड पाणी हा आरोग्याशी खेळण्याचा धंदा !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 25, 2024 20:21 IST

- परवानाविना सुरू आहेत आरओ प्रकल्प : नियंत्रण कुणाचे?, अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम, लग्नसमारंभात मोठी मागणी

नागपूर : प्रत्येक लग्नसमारंभात वऱ्हाडी मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधील थंड पाणी कुठलीही शहानिशा न करता पिताे. या पाण्याच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्याशी खेळत तर नाही ना, याची पुसटशी कल्पना त्यांना येत नाही. शहरात अशा थंड पाण्याचे एक हजाराहून अधिक आरओ प्रकल्प सरकारी परवान्याविनाच सुरू आहेत. या प्रकल्पावर नियंत्रण कुणाचे हा अनेक वर्षांपासून वादाचा विषय आहे. कॅनमधून विकले जाणारे थंड पाणी हा आरोग्याशी खेळण्याचा धंदा असल्याचा ग्राहक संघटनांचा आरोप आहे.

नियंत्रण कुणाचे? संभ्रम अजूनही कायमसीलबंद पाण्याच्या बाटलीची निर्मिती आणि विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे. मात्र खुल्या पाण्याच्या विक्रीवर मनपाचा आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, भारतीय मानक ब्यूरो, वैधमापनशास्त्र विभाग आणि अन्य सरकारी विभागाचे नियंत्रण नाही. त्यामुळे कॅनमध्ये थंड पाणी भरणारे आरओ प्रकल्प गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहेत. बक्कळ नफ्यामुळे या प्रकल्पाची संख्या एक हजारावर गेली आहे. बहुतांश प्रकल्पात कुणीही प्रक्रिया न करता विहीर किंवा बोअरिंगचे पाणी थंड करून कॅनमध्ये (१७ लिटर) भरून ४० ते ५० रुपयात विकले जाते. यातून दररोज नागपूर शहरात लाखो रुपयांची उलाढाल होते. आयकर वा जीएसटी आकरणी होत नसल्याने हा व्यवसाय फोफावला आहे. खरं तर मनपा नागपूरकराला एक युनिट म्हणजेच ६ ते ७ रुपयात एक हजार लिटर शुद्ध पाणी पुरविते. तर दुसरीकडे कॅनमधील १७ लिटर पाणी ४० रुपयांत विकले जात आहे. ही ग्राहकांची सर्रास लूट आहे.

जिल्हाधिकारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्षग्राहकाशी संंबंधित प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सचिवपदी जिल्हा पुरवठा अधिकारी असतात. पाण्याची शुद्धता नाही, मानकानुसार थंड पाण्याची निर्मिती होत नाही. प्रशासन जबाबदारी घेण्यास तयार नाही. काही वर्षांआधी आरओ प्रकल्पांवर कारवाई झाली तेव्हा असोसिएशनने आमची जबाबदारी एखाद्या विभागाकडे ठरवून देण्याची मागणी केली होती. पण त्यावर निर्णय अजूनही प्रलंबित आहे. आरओ प्रकल्पांवर कारवाई कुणी करावी, यावर मार्गदर्शक तत्वे अजून तयार झाली नाहीत. लवकरच येण्याची शक्यता आहे. 

लोकांचे आरोग्य होताहेत खराबमिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून होणारी थंड पाण्याची विक्री हा आरोग्याशी खेळण्याचा गोरखधंदा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावर सरकारी विभागाचे नियंत्रण नाही. या पाण्यामुळे अनेकांचे आरोग्य खराब होत आहे. पाण्याची शुद्धता नाही, मानके नाहीत. प्रशासनाने जबाबदारी स्वीकारावी आणि कारवाई करावी. तपासणीची जबाबदारी एखाद्या विभागाकडे सोपवावी आणि हा गोरखधंदा बंद करावा.- गजानन पांडे, पश्चिम क्षेत्रिय संघटनमंत्री, अ.भा.ग्राहक पंचायत.

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य