शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

कॅनमधून विकले जाणारे थंड पाणी हा आरोग्याशी खेळण्याचा धंदा !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 25, 2024 20:21 IST

- परवानाविना सुरू आहेत आरओ प्रकल्प : नियंत्रण कुणाचे?, अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम, लग्नसमारंभात मोठी मागणी

नागपूर : प्रत्येक लग्नसमारंभात वऱ्हाडी मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधील थंड पाणी कुठलीही शहानिशा न करता पिताे. या पाण्याच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्याशी खेळत तर नाही ना, याची पुसटशी कल्पना त्यांना येत नाही. शहरात अशा थंड पाण्याचे एक हजाराहून अधिक आरओ प्रकल्प सरकारी परवान्याविनाच सुरू आहेत. या प्रकल्पावर नियंत्रण कुणाचे हा अनेक वर्षांपासून वादाचा विषय आहे. कॅनमधून विकले जाणारे थंड पाणी हा आरोग्याशी खेळण्याचा धंदा असल्याचा ग्राहक संघटनांचा आरोप आहे.

नियंत्रण कुणाचे? संभ्रम अजूनही कायमसीलबंद पाण्याच्या बाटलीची निर्मिती आणि विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे. मात्र खुल्या पाण्याच्या विक्रीवर मनपाचा आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, भारतीय मानक ब्यूरो, वैधमापनशास्त्र विभाग आणि अन्य सरकारी विभागाचे नियंत्रण नाही. त्यामुळे कॅनमध्ये थंड पाणी भरणारे आरओ प्रकल्प गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहेत. बक्कळ नफ्यामुळे या प्रकल्पाची संख्या एक हजारावर गेली आहे. बहुतांश प्रकल्पात कुणीही प्रक्रिया न करता विहीर किंवा बोअरिंगचे पाणी थंड करून कॅनमध्ये (१७ लिटर) भरून ४० ते ५० रुपयात विकले जाते. यातून दररोज नागपूर शहरात लाखो रुपयांची उलाढाल होते. आयकर वा जीएसटी आकरणी होत नसल्याने हा व्यवसाय फोफावला आहे. खरं तर मनपा नागपूरकराला एक युनिट म्हणजेच ६ ते ७ रुपयात एक हजार लिटर शुद्ध पाणी पुरविते. तर दुसरीकडे कॅनमधील १७ लिटर पाणी ४० रुपयांत विकले जात आहे. ही ग्राहकांची सर्रास लूट आहे.

जिल्हाधिकारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्षग्राहकाशी संंबंधित प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सचिवपदी जिल्हा पुरवठा अधिकारी असतात. पाण्याची शुद्धता नाही, मानकानुसार थंड पाण्याची निर्मिती होत नाही. प्रशासन जबाबदारी घेण्यास तयार नाही. काही वर्षांआधी आरओ प्रकल्पांवर कारवाई झाली तेव्हा असोसिएशनने आमची जबाबदारी एखाद्या विभागाकडे ठरवून देण्याची मागणी केली होती. पण त्यावर निर्णय अजूनही प्रलंबित आहे. आरओ प्रकल्पांवर कारवाई कुणी करावी, यावर मार्गदर्शक तत्वे अजून तयार झाली नाहीत. लवकरच येण्याची शक्यता आहे. 

लोकांचे आरोग्य होताहेत खराबमिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून होणारी थंड पाण्याची विक्री हा आरोग्याशी खेळण्याचा गोरखधंदा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावर सरकारी विभागाचे नियंत्रण नाही. या पाण्यामुळे अनेकांचे आरोग्य खराब होत आहे. पाण्याची शुद्धता नाही, मानके नाहीत. प्रशासनाने जबाबदारी स्वीकारावी आणि कारवाई करावी. तपासणीची जबाबदारी एखाद्या विभागाकडे सोपवावी आणि हा गोरखधंदा बंद करावा.- गजानन पांडे, पश्चिम क्षेत्रिय संघटनमंत्री, अ.भा.ग्राहक पंचायत.

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य