शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

चिरंजीव प्रसाद सांभाळणार नागपूर परीक्षेत्राची जबाबदारी; कोळसा तस्करी अन् अवैध दारू विक्रीचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 9:00 PM

सोमवारी सांभाळणार पदभार

 नागपूर: जातीय दंगलीने होरपळून निघू पाहणाऱ्या औरंगाबाद शहराला शांतताप्रिय शहर अशी ओळख देण्याचे उल्लेखनीय कार्य करणारे औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसादनागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत. राज्य सरकारने आज आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यातून येथील महानिरिक्षक के. एम. प्रसन्ना यांची औरंगाबादला तर औरंगाबादचे आयुक्त प्रसाद यांची नागपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली. सन १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले चिरंजीव प्रसाद २०१८ पासून औरंगाबाद मध्ये पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

जानेवारी  ते मे २०१८ या  कालावधीत भीमा कोरेगांवमुळे औरंगाबाद येथे झालेली दंगल तसेच ११ मे च्या रात्री जुन्या शहरात झालेल्या जातीय दंगलीमुळे शहर होरपळून निघाले होते. या परिस्थितीत पोलीस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद रुजू  झाले होते. त्यांनी कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून विविध भागात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. बेरोजगार तरुण आणि महिलाना रोजगारभिमुख प्रशिक्षण देउन रोजगार मिळवून देण्याचा एक हाती  कार्यक्रम राबविला. यातून नागरिकांचा विश्वास जिंकण्यात त्यांनी यश मिळवले. तसेच पोलीस आणि जनतेतील अविश्वासाची दरी कमी करण्याचीही कामगिरी बजावली. यानंतर छोट्या मोठ्या घटनेचे रूपांतर दंगलीत होणार  नाही, याची काळजी घेतली. यातून  औरंगाबादला शांतताप्रिय शहर म्हणून ओळख मिळवून देण्यात  प्रसाद यशस्वी ठरले. आता ते नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

या क्षेत्रात नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा हे चार जिल्हे येतात. त्यातील चंद्रपूर आणि वर्धा हे दोन जिल्हे दारूबंदीचे जिल्हे म्हणून परिचित असले तरी या दोन्ही जिल्ह्यात देशी-विदेशी गावठी आणि बनावट विलायती दारू विकली जाते शिवाय चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा तस्करीचा ही मोठा गोरख धंदा आहे. या गोरख धंद्याला आळा घालण्याची जबाबदारी प्रसाद यांच्यावर आहे. आपण दोन-तीन दिवसात नागपुरात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारू, असे त्यांनी लोकमत'शी चर्चा करताना सांगितले. परीक्षेत्राचा आढावा घेतल्यानंतर प्राधान्याने काय करायचे, ते आपण ठरवू , असेही ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरChiranjiv Prasadचिरंजीव प्रसादMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार