शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

केंद्रीय पथकाच्या महाजेनकोला कानपिचक्या; वीजकेंद्राद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 14:22 IST

शुक्रवारी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या पथकाने काेराडी व खापरखेडा औष्णिक वीजकेंद्राद्वारे हाेणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली.

ठळक मुद्देफुटलेल्या पाईपलाईनमधून नदी, शेतात राखेचा प्रवाह

नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)च्या नाेटीसनंतर शुक्रवारी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या पथकाने काेराडी व खापरखेडा औष्णिक वीजकेंद्राद्वारे हाेणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली. वीजकेंद्रातून निघणारी पाईपलाईन जागाेजागी फुटल्याने नदी, तलाव व शेतात पसरलेला राखेचा प्रवाह पाहून त्यांनाही धक्का बसला. मंत्रालयाच्या पथकाने हा सर्व प्रकार ताबडताेब थांबविण्याचे कडक निर्देश साेबत असलेल्या महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मंत्रालयातर्फे वैज्ञानिक डाॅ. सुरेश कुमार अडपा, डाॅ. पी. साखरे यांच्यासह इतर अधिकारी, एमपीसीबीचे अधिकारी तसेच महाजेनकाेचे अधिकारी या निरीक्षण दाैऱ्यात सहभागी हाेते. यासह प्रदूषणाविराेधात सातत्याने लढा देणाऱ्या सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुद्धे, शुभांगी पडाेळे तसेच सुरादेवी, वारेगाव, भानेगाव, कवठा आदी गावचे सरपंच व ग्रामस्थ सहभागी हाेते. या पथकाने काेराडी व खापरखेडा वीजकेंद्राला लागून असलेल्या गावांमध्ये आठ ठिकाणी पाहणी केली.

- खैरी गावच्या नाल्यातून सांडपाणी नाही तर राखेचा प्रवाह वाहत असल्याचे दिसले. सरपंच माेरेश्वर कापसे यांनी हा प्रकार थांबविण्याची मागणी केली. एमपीसीबीच्या पथकाने नाला व बाेअरवेलच्या पाण्याचे नमुने गाेळा केले.

- कवठा जलशुद्धीकरण केंद्र, वारेगाव राेडवर अक्षरश: काेराडी वीजकेंद्राची राख पसरली हाेती.

- सुरादेवी, काेलार नदी : खापरखेडा वीजकेंद्राची राख फुटलेल्या पाईपलाईनमधून थेट वाहत असल्याचे दिसून आले. गावातील बाेअरवेलच्या पाण्याचे नमुनेसुद्धा गाेळा करण्यात आले.

- वारेगाव अॅशबाॅण्डची राख थेट वारेगाव पुलाखाली साेडली जाते. यानंतर अॅशबाॅण्डच्या पाण्याचे शुद्धीकरण करणाऱ्या वारेगाव पंपहाऊसचेही निरीक्षण करण्यात आले.

- भानेगाव पूल : या पाॅइंटवरून खापरखेडा केंद्राची राख थेट कन्हान नदीत जात असल्याचे आढळून आले. येथील पाण्याचे नमुनेही घेण्यात आले.

ताबडताेब बंदाेबस्त करा

वेगवेगळ्या ठिकाणी फुटलेल्या पाईपलाईनमधून राखेचा प्रवाह नदी, तलावात मिसळून पाणी प्रदूषित करीत आहे. या प्रदूषणामुळे अनेक गावातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यावर तातडीने उपाययाेजना करण्याचे निर्देश महाजेनकाेला देण्यात आले. महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांनी उपाययाेजना करण्याचा भराेसा दिला.

राखेचा १०० टक्के उपयाेग का नाही?

वीजकेंद्राच्या राखेचा १०० टक्के उपयाेग करण्याचे केंद्रीय मंत्रालयाचे निर्देश आहेत; पण काेराडी, खापरखेडा केंद्राद्वारे तसे नियाेजनच करण्यात आले नाही. उलट विदर्भात राखेला मागणी नसल्याचे महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे हाेते. मग माैदा वीजकेंद्राप्रमाणे इतरत्र का पाठविली जात नाही, असा प्रश्न पडताे.

समिती स्थापन करण्याचे निर्देश

वीजकेंद्रातील प्रदूषणावर नियमित देखरेख ठेवण्यासाठी अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व एनजीओच्या प्रतिनिधींना घेऊन एक समिती स्थापन करण्याचे निर्देश मंत्रालयाने महाजेनकाेला दिले.

टॅग्स :environmentपर्यावरणGovernmentसरकारpollutionप्रदूषण