शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

केंद्रीय पथकाच्या महाजेनकोला कानपिचक्या; वीजकेंद्राद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 14:22 IST

शुक्रवारी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या पथकाने काेराडी व खापरखेडा औष्णिक वीजकेंद्राद्वारे हाेणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली.

ठळक मुद्देफुटलेल्या पाईपलाईनमधून नदी, शेतात राखेचा प्रवाह

नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)च्या नाेटीसनंतर शुक्रवारी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या पथकाने काेराडी व खापरखेडा औष्णिक वीजकेंद्राद्वारे हाेणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली. वीजकेंद्रातून निघणारी पाईपलाईन जागाेजागी फुटल्याने नदी, तलाव व शेतात पसरलेला राखेचा प्रवाह पाहून त्यांनाही धक्का बसला. मंत्रालयाच्या पथकाने हा सर्व प्रकार ताबडताेब थांबविण्याचे कडक निर्देश साेबत असलेल्या महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मंत्रालयातर्फे वैज्ञानिक डाॅ. सुरेश कुमार अडपा, डाॅ. पी. साखरे यांच्यासह इतर अधिकारी, एमपीसीबीचे अधिकारी तसेच महाजेनकाेचे अधिकारी या निरीक्षण दाैऱ्यात सहभागी हाेते. यासह प्रदूषणाविराेधात सातत्याने लढा देणाऱ्या सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुद्धे, शुभांगी पडाेळे तसेच सुरादेवी, वारेगाव, भानेगाव, कवठा आदी गावचे सरपंच व ग्रामस्थ सहभागी हाेते. या पथकाने काेराडी व खापरखेडा वीजकेंद्राला लागून असलेल्या गावांमध्ये आठ ठिकाणी पाहणी केली.

- खैरी गावच्या नाल्यातून सांडपाणी नाही तर राखेचा प्रवाह वाहत असल्याचे दिसले. सरपंच माेरेश्वर कापसे यांनी हा प्रकार थांबविण्याची मागणी केली. एमपीसीबीच्या पथकाने नाला व बाेअरवेलच्या पाण्याचे नमुने गाेळा केले.

- कवठा जलशुद्धीकरण केंद्र, वारेगाव राेडवर अक्षरश: काेराडी वीजकेंद्राची राख पसरली हाेती.

- सुरादेवी, काेलार नदी : खापरखेडा वीजकेंद्राची राख फुटलेल्या पाईपलाईनमधून थेट वाहत असल्याचे दिसून आले. गावातील बाेअरवेलच्या पाण्याचे नमुनेसुद्धा गाेळा करण्यात आले.

- वारेगाव अॅशबाॅण्डची राख थेट वारेगाव पुलाखाली साेडली जाते. यानंतर अॅशबाॅण्डच्या पाण्याचे शुद्धीकरण करणाऱ्या वारेगाव पंपहाऊसचेही निरीक्षण करण्यात आले.

- भानेगाव पूल : या पाॅइंटवरून खापरखेडा केंद्राची राख थेट कन्हान नदीत जात असल्याचे आढळून आले. येथील पाण्याचे नमुनेही घेण्यात आले.

ताबडताेब बंदाेबस्त करा

वेगवेगळ्या ठिकाणी फुटलेल्या पाईपलाईनमधून राखेचा प्रवाह नदी, तलावात मिसळून पाणी प्रदूषित करीत आहे. या प्रदूषणामुळे अनेक गावातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यावर तातडीने उपाययाेजना करण्याचे निर्देश महाजेनकाेला देण्यात आले. महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांनी उपाययाेजना करण्याचा भराेसा दिला.

राखेचा १०० टक्के उपयाेग का नाही?

वीजकेंद्राच्या राखेचा १०० टक्के उपयाेग करण्याचे केंद्रीय मंत्रालयाचे निर्देश आहेत; पण काेराडी, खापरखेडा केंद्राद्वारे तसे नियाेजनच करण्यात आले नाही. उलट विदर्भात राखेला मागणी नसल्याचे महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे हाेते. मग माैदा वीजकेंद्राप्रमाणे इतरत्र का पाठविली जात नाही, असा प्रश्न पडताे.

समिती स्थापन करण्याचे निर्देश

वीजकेंद्रातील प्रदूषणावर नियमित देखरेख ठेवण्यासाठी अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व एनजीओच्या प्रतिनिधींना घेऊन एक समिती स्थापन करण्याचे निर्देश मंत्रालयाने महाजेनकाेला दिले.

टॅग्स :environmentपर्यावरणGovernmentसरकारpollutionप्रदूषण