शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बडी दूर से आये है... प्यार का तोहफा लाये है..!!

By admin | Updated: September 7, 2015 03:01 IST

चित्रपट संगीताचे सुवर्णयुग गाजविणारे सुप्रसिद्ध संगीतकार म्हणजे कल्याणजी-आनंदजी. या जोडगोळीने दिलेल्या संगीतावर अनेक पिढ्यांचे भावविश्व पोसले गेले आहे.

संगीतकार आनंदजी शाह यांच्याशी संवाद : उलगडल्या जुन्या गीतांच्या आठवणी नागपूर : चित्रपट संगीताचे सुवर्णयुग गाजविणारे सुप्रसिद्ध संगीतकार म्हणजे कल्याणजी-आनंदजी. या जोडगोळीने दिलेल्या संगीतावर अनेक पिढ्यांचे भावविश्व पोसले गेले आहे. प्रतिभावंत गायक, सर्जनशील कवी, गीतकारांनी लिहिलेल्या गीतांना स्वरांचे अनवट कोंदण देणारे आणि रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य करणारे संगीतकार कल्याणजी-आनंदजी. राजकपूरपासून अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्या अनेक चित्रपटांना संगीत देतांना त्यातली गीते या जोडगोळीने अजरामर केलीत. त्यात पार्श्वगायक मुकेश, किशोरदा, मो. रफी, लतादीदींसारख्या तयार गायकांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर ही गीते कोरली आहे. या जोडगोळीतल्या आनंदजी शाह यांच्याकडूनच त्यांनी संगीतबद्ध केलेले गीत ऐकणे, गीतांचे संदर्भ, आठवणी समजून घेणे रसिकांसाठी सुवर्णकांचन योग. आनंदजी आले, गीत सादर केले, संवाद साधला आणि त्यांनी नागपूरकरांना जिंकले. सूरसंगम आणि मैत्री परिवार संस्थेच्यावतीने आनंदजी यांच्याशी संवाद साधत त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा ‘जिंदगी का सफर..’ हा कार्यक्रम रविवारी डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आनंदजी मंचावर येताच नागपूरकर रसिकांनी उभे राहून त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमातून मिळालेला निधी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारल्यानंतर आनंदजींनी ‘बडी दूर से आये है...प्यार का तोहफा लाये है...’ हे गीत सादर करुन तुमच्यासाठी आठवणींचा खजिना घेऊन मी आलो आहे, असे सांगितले. मिश्किल स्वभावाच्या आनंदजींनी प्रासंगिक विनोद करीत रसिकांना हसत-हसवित ठेवत अनेक गीतांचे संदर्भ, आठवणी आणि गीतांची चाल कशी सुचली, याचा उहापोह केला. निवेदक डॉ. मनोज साल्पेकर यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देत त्यांनी यावेळी काही गीतेही सादर केलीत आणि प्रेक्षकांची दाद घेतली. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन महेंद्र ढोले आणि सचिन ढोमणे यांनी केले. यावेळी शहरातील लोकप्रिय गायक सागर मधुमटके, यशश्री भावे, सारंग जोशी, योगेंद्र रानडे, अरविंद पाटिल, अंचल शर्मा आणि सुप्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे यांनी तयारीने गीते सादर करुन रसिकांना आनंद दिला. याप्रसंगी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली ‘रोते हुअ‍े आते है सब.., वक्त करता जो वफा.., मेरे तुटे हुअ‍े दिल को.., डम डम डिगा डिगा.., कोई जब तुम्हारा हृदय तोडदे..., चंदन सा बदन.., यु ही तुम मुझसे बात करती हो..किसी राह मे...’आदी अनेक लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. प्रारंभी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख, माजी खा. विलास मुत्तेमवार, महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते आनंदजींचा त्यांच्या पत्नी शांताबेन यांच्यासह शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन नागपूरकरांच्यावतीने गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)नागपूरकर संगीताचे जाणकारनागपुरातील कार्यक्रमासाठी मला निमंत्रण मिळाले तेव्हा मी जरा घाबरलो. नागपुरात मी १९५४ पासून येत आहे. येथील रसिक संगीताचे दर्दी आणि जाणकार आहेत. त्यामुळे येथे कार्यक्रम करताना दडपण यायचे. पण दर्दी रसिकांसमोर येताना मला आज आनंद वाटतो, असे सांगताना आनंदजींनी पत्नीला नागपूरकरांच्या पाया पडायला सांगितले आणि हंशा पिकला. लग्न झाल्यावर माणसाला पत्नीचे किती ऐकावे लागते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य कसे संपते याचे अनेक किस्से मिश्किलपणे सांगतांना त्यांनी बायको या विषयावर विनोद करून कार्यक्रमाची रंगत कायम ठेवली.