शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला बॉम्बस्फोटाची धमकी, पण यंत्रणा तयार ; सुरक्षेचा ‘फुल प्रूफ’ प्लॅन

By नरेश डोंगरे | Updated: May 13, 2025 18:13 IST

यंत्रणांकडून रेल्वेला सुरक्षेचे कवच : ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर, गाड्यांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून मोठा घातपात करण्याची धमकी मिळाल्याने राज्यच नव्हे तर देशभरातील सुरक्षा यंत्रणांनी रेल्वेला सुरक्षेचे कवच घातले आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांसह सशस्त्र जवानांकडून रेल्वे गाड्या आणि ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दहशतवाद्यांकडून भारतात घातपात घडवून निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलाच धडा शिकविला आहे. अवघ्या तीन दिवसांत अनेक खुंखार दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले आहे. भारताकडून एअर बेस नष्ट करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले गेल्यामुळे शस्त्रसंधीसाठी पाकिस्तान गयावया करीत होता. मात्र,शस्त्रसंधी झाल्यानंतरही त्याची खुमखुमी जिरलेली नाही. ते लक्षात घेऊन भारताकडून कडक उपाययोजना केल्या जात असतानाच सोमवारी रेल्वेत बॉम्ब स्फोट घडविण्याची धमकी देणारा मेसेज सुरक्षा यंत्रणांना मिळाला आहे. त्याची अत्यंत गंभीरपणे दखल घेण्यात आली असून, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील रेल्वे प्रशासनांना, सुरक्षा यंत्रणांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

रेल्वेतील सिरियल ब्लास्टच्या आठवणी

११ जुलै २००६ ला दहशतवाद्यांनी मुंबईतील वेगवेगळ्या लोकल ट्रेनमध्ये ११ मिनिटात सात बॉम्बस्फोट घडवून आणले होते. ज्यात १८९ लोकांचे जीव गेले तर, ८०० पेक्षा जास्त निरपराध नागरिकांना जीवघेण्या जखमा झाल्या होत्या. माहिम, बांद्रा, मीरा रोड, माटूंगा, खार, जोगेश्वरी आणि बोरीवली रेल्वे स्थानकावर पोहचलेल्या लोकलमध्ये हे स्फोट झाले होते. आरडीएक्स आणि अमोनिअम नायट्रेटच्या माध्यमातून घडवून आणलेल्या या शक्तीशाली स्फोटांच्या आठवणी आज १९ वर्षानंतरही ताज्याच आहेत.

सर्वत्र कडक बंदोबस्त : अतिरिक्त महासंचालक साळुंकेधमकीच्या मेसेजची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त लावण्यात आला असून रेल्वे गाड्यांमध्येही कसून तपासणी केली जात आहे. सुरक्षेसंबंधाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती तिरिक्त पोलीस महासंचालक (रेल्वे) प्रवीण साळुंके यांनी या संबंधाने 'लोकमत'शी बोलताना दिली.

बीडीडीएससह सशस्त्र जवानांकडूनही तपासणी : आरपीएफ आयुक्त आर्य

दपूम रेल्वे सुरक्षा दलाकडे डिव्हीजनमध्ये नागपूरसह सात ठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथके आहेत. तर, नागपूर आणि गोंदियात श्वान पथकेही आहेत. ही सर्व पथके २४ तास अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहेत. बीडीडीएससह सशस्त्र जवानांकडून वेळोवेळी रेल्वे स्थानके आणि गाड्यांची तपासणी केली जात असल्याची माहिती, आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :railwayरेल्वेBombsस्फोटकेnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र